सुरुवात – 2008 – 2009
उद्देश – पाणी टंचाई व पाण्याच्या वाढत्या मागणीवर मात करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व स्वच्छता विषयक सुविधा सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे
महाराष्ट्र सुजल आणि निर्मल अभियानांतर्गत राज्याने पाणीपुरवठा व स्वच्छतेसंदर्भात तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय सुधारणा करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र व गुणवत्तापूर्ण सुविधा सेवा शुल्क तत्त्वावर उपलब्ध केली आहे. या योजनेच्या सुरुवातीपासून पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या 719, 14 कोटी रुपये इतक्या खर्चाच्या 198 कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून 341,34 कोटी रुपये निधी वितरित केला आहे.
सन 2012 – 13 मध्ये जानेवारीअखेरपर्यंत 86.26 कोटी रुपये खर्च झाला आहे. तर 2013 – 14 महाराष्ट्र अंदाजपत्रकात (बजेट) सुजल निर्मल अभियानासाठी 145 कोटी 45 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.