११ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
११ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |11 April 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

११ एप्रिल चालू घडामोडी

रणजी करंडक स्पर्धा ५ जानेवारीपासून; देशांतर्गत क्रिकेट हंगामाला यंदा जूनमध्ये प्रारंभ

  • देशांतर्गत क्रिकेटच्या २०२३-२४च्या हंगामाला जूनमध्ये दुलीप करंडक स्पर्धेसह प्रारंभ होणार असून, प्रतिष्ठेची रणजी करंडक स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीपासून खेळवली जाईल.
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) रविवारी झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यामध्ये देशांतर्गत क्रिकेटच्या हंगामाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. दुलीप करंडक स्पर्धा २८ जूनपासून सुरू होईल, तर रणजी करंडकाला पुढील वर्षी ५ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.
  • पुरुषांच्या वरिष्ठ गटातील हंगामाची सांगता रणजी स्पर्धेने होईल. स्पर्धेतील एलिट विभागातील लढती ५ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होतील. बाद फेरीच्या लढती २३ फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान खेळवण्यात येतील. रणजी स्पर्धेचा एकूण कालावधी ७० दिवसांचा असेल. प्लेट विभागातील सामने ५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२४, तर बाद फेरीचे सामने ९ ते २२ फेब्रुवारी २०२४ दरम्यान होणार आहेत.

मराठी भाषा विद्यापीठासाठी १५ दिवसांत समिती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; समितीत एका महानुभाव अभ्यासकाचा समावेश

  • ज्या ठिकाणी मराठीतील आद्यग्रंथ लिहिला गेला त्या रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ उभारण्यात येणार असून विद्यापीठाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी एक समिती १५ दिवसांत स्थापन करण्यात येईल. समितीत एका महानुभाव अभ्यासकाचा समावेश असेल. दोन महिन्यांत सूचना प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठ सुरू करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
  •  सध्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची इमारत,  रिद्धपूर येथे थीम पार्कमध्ये सभागृह, कक्ष उपलब्ध आहेत. तिथे तत्काळ विद्यापीठाचे आवश्यक ते काम सुरू करता येऊ शकेल. हे विद्यापीठ संलग्नित असावे की इतर भाषा विद्यापीठाप्रमाणे एकल असावे, याविषयीही समितीला सूचना करण्यास सांगण्यात आले आहे. अनेक अभ्यासक्रम मराठीत सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी या विद्यापीठाचा उपयोग होईल, असे  फडणवीस यांनी स्पष्ट केले.
  • नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीनजीक पीएम मित्रा योजनेअंतर्गत १ हजार एकर जागेवर मेगा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २२० एकर क्षेत्राचे भूसंपादन केले असून उर्वरित भूसंपादन पुढील पंधरा दिवसांत केले जाणार आहे. भूसंपादनासाठी चांगले दर देण्यात आले आहेत. केंद्र सरकारसोबत सहमती करार केल्यानंतर पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
  • रेमंड हा उद्योगसमूह देशातील सर्वात मोठी गुंतवणूक या ठिकाणी करण्यास तयार आहे. कापूस – कापड ते फॅशन ही संकल्पना प्रत्यक्ष आकाराला येणार असून पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहेच, शिवाय येथील बेरोजगार तरुणांच्या हातालाही काम मिळणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

भारतात करोना संसर्ग का वाढतोय? इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितली तीन कारणं

  • मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह भारतात करोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय संस्था सतर्क झाल्या आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच करोना नियमांचं काटेकोर पालन करण्याबाबत नागरिकांना आवाहन केलं जात आहे. सोमवारी भारतातील नवीन करोना रुग्णांमध्ये जवळपास १० टक्क्यांची वाढ झाली आहे.
  • भारतातील करोना रुग्णांच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने तीन प्रमुख कारणं सांगितली आहेत. “कोविड-१९ नियमांमध्ये शिथिलता, करोना चाचण्यांमध्ये झालेली घट आणि कोविड-१९ चे नवीन व्हेरिएंट” या तीन कारणांमुळे भारतात करोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं निरीक्षण इंडियन मेडिकल असोसिएशनने नोंदवलं आहे.
  • सोमवारी भारतात नवीन करोना रुग्णांच्या संख्येत जवळपास १० टक्के वाढ नोंदली आहे. करोनाचा वाढता आलेख पाहता देशात पुन्हा एकदा करोना निर्बंध लादण्याची भीती लोकांना सतावत आहे.

जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत : दुसऱ्या डावात नेपोम्नियाशीचा लिरेनवर विजय

  • रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोम्नियाशीने सोमवारी जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या दुसऱ्या डावात काळय़ा मोहऱ्यांनिशी खेळताना चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेनवर २९ चालींमध्येच विजय मिळवला. यासह नेपोम्नियाशीने जागतिक अजिंक्यपद लढतीत आघाडी घेतली आहे.
  • नेपोम्नियाशी आणि लिरेन यांच्यातील रविवारी झालेला पहिला डाव बरोबरीत सुटला होता. दुसऱ्या डावात मात्र नेपोम्नियाशीने अप्रतिम खेळ केला. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या लिरेनला वेळेचे योग्य नियोजन करता आले नाही. त्याने आपल्या चाली खेळण्यासाठी बराच वेळ घेतला. त्यामुळे त्याच्यावर दडपण आले आणि त्याने चूक केली. पुढे सी१चा धोका लक्षात घेऊन २९व्या चालीअंती लिरेनने पराभव स्वीकारला. त्यावेळी त्याच्याकडे पुढील चाली रचण्यासाठी एका मिनिटाहूनही कमी वेळ शिल्लक होता.
  • जागतिक अजिंक्यपद लढतीत २०१४ नंतर प्रथमच एखाद्या खेळाडूला दुसऱ्या डावात विजय मिळवण्यात यश आले. २०१४मध्ये मॅग्नस कार्लसनने विश्वनाथन आनंदला पराभूत केले होते. तसेच काळय़ा मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या खेळाडूने २००६ नंतर प्रथमच दुसऱ्या डावात विजयाची नोंद केली.
  • नेपोम्नियाशीने आव्हानवीरांच्या (कॅन्डिडेट्स) स्पर्धेतही काळय़ा मोहऱ्यांनी खेळताना लिरेनवर सरशी साधली होती. मात्र, त्यानंतर लिरेनने दमदार पुनरागमन करताना स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले होते. त्यामुळे नेपोम्नियाशीला पुढील फेऱ्यांमध्येही सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
  • कोणत्याही जागतिक अजिंक्यपद लढतीतील हा सर्वात निराशाजनक डाव होता. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या डिंग लिरेनच्या चाली फारच अनपेक्षित होत्या. पहिल्या डावापासून तो दडपणाखाली दिसतो आहे. त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता जाणवते आहे. दुसऱ्या डावातील त्याची चौथी चाल एच३ होती. या चालीमुळे तो अडचणीत सापडला. मग नेपोम्नियाशीने ११व्या चालीत वर्चस्व मिळवले. लिरेनला आपण अडचणीत सापडल्याचे लक्षात आले नाही आणि त्याच्या पुढील चालीही फारशा प्रभावी ठरल्या नाहीत.

एक चूक झाली आणि ‘गुगल पे’ने अनेक युजर्सच्या खात्यावर ८० हजार रुपये पाठवले, नेमकं काय घडलं? वाचा…

  • गुगल पे वापरकर्त्यांसाठी अचानक एक सुखद धक्का बसला. गुगल पेने अचानक आपल्या वापरकर्त्यांच्या खात्यावर कॅश बॅगच्या स्वरुपात जवळपास ८०,००० रुपये पाठवले. अशाप्रकारे पैसे आलेले पाहून अनेकांना आनंद झाला. मात्र, हा आनंद फार कमी काळ टिकला. गुगल पेच्या एका तांत्रिक चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला.

नेमकं काय घडलं?

  • गुगल पेच्या तांत्रिक चुकीमुळे अचानक तब्बल ८० हजार रुपये विविध लोकांच्या बँक खात्यावर जमा झाले. यानंतर ज्यांच्या खात्यावर अचानकपणे हे पैसे जमा झाले त्यांना सुखद धक्का बसला. त्यांना कॅशबॅक स्वरुपात रिवार्डमध्ये हे पैसे आलेले दिसले. अनेकांना तर हे पैसे आपल्याला का मिळाले हेही कळाले नाही.
  • पत्रकार मिशाल रहमान यांनी याबाबत ट्वीट केलं. ते म्हणाले, “सध्या गुगल पे वापरकर्त्यांना मोफत पैसे देत आहे असं वाटतं. मी गुगल पे उघडलं आणि रिवार्ड्समध्ये मला ३ हजार ७७१ रुपये आल्याचं दिसलं.”
  • असं असलं तरी अचानक कारण नसताना मिळालेल्या या पैशांचा आनंद काही काळासाठीचाच ठरला. गुगल पेच्या तांत्रिक विभागाला ही चूक लगेच लक्षात आली आणि त्यांनी जमा केलेले पैसे पुन्हा परत घेतले.

गुगलकडून आलेले पैसे खर्च केले त्यांचं काय?

गुगलने आपल्या खात्यावर पैसे जमा केल्यानंतर काही वापरकर्त्यांनी लगोलग हे पैसे वापरले. त्यामुळे गुगलच्या तांत्रिक चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा पैसे घेताना काही जणांच्या खात्यावर पैसेच नव्हते. अशा युजर्सला गुगल पेने एक ईमेल पाठवला. यात त्यांनी तुम्हाला खात्यावर आलेले पैसे परत करणं शक्य नसेल, तर ते पैसे तुमचे आहेत, असं म्हटलं. तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असंही स्पष्ट केलं.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

११ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.