१८ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१८ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |18 October 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१८ ऑक्टोबर चालू घडामोडी

डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू, आकर्षी दुसऱ्या फेरीत

  • भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि आकर्षी काश्यप यांनी डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेनला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.सिंधूने पहिल्या फेरीचा अडथळा पार केला असला, तरी तिला विजयासाठी तीन गेम आणि ५६ मिनिटे झुंजावे लागले.
  • सिंधूने स्कॉटलंडच्या किस्र्टी गिलमोरचा २१-१४, १८-२१, २१-१० असा पराभव केला. आकर्षी कश्यपलाही तीन गेम लढत द्यावी लागली. आकर्षीने जर्मनीच्या ली वोन्नेचे आव्हान १०-२१, २२-२०, २१-१२ असे संपुष्टात आणले. दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्काचे आव्हान असेल. सिंधूने ग्रेगोरियाविरुद्ध आठ लढती जिंकल्या असल्या तरी अखेरच्या तीनपैकी दोन लढतीत ग्रेगोरियाने सिंधूला पराभूत केले आहे. त्याच वेळी आकर्षी थायलंडच्या सुपानिदा केटथाँगशी खेळेल.
  • पुरुष एकेरीत श्रीकांतला मात्र, लय मिळवण्यात अपयश आले. त्याचा कडवा प्रतिकार कमी पडला. चीनच्या वेंग हाँग यांगने श्रीकांतवर १९-२१, २१-१०, २१-१६ असा विजय मिळवला. लक्ष्य सेनलाही पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही.
  • लक्ष्यला थायलंडच्या केन्टाफॉन वँगचारोएनकडून १६-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. दरम्यान, पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी, एम.आर. अर्जुन-ध्रुव कपिला, तर महिला दुहेरीत ट्रीसा जॉली-गायत्री वर्तक यांनी माघार घेतली.

आठ नव्या सदस्यांसह ‘आयओसी’ कार्यकारी मंडळात आता १०७ जण

  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) १४१व्या अधिवेशनात आठ नव्या सदस्यांची निवड करण्यात आली असून, आता ‘आयओसी’चे कार्यकारी मंडळ १०७ जणांचे असेल.
  • नव्याने समावेश करण्यात आलेल्या आठ सदस्यांमध्ये चार महिलांचा समावेश असून, यामुळे आता ‘आयओसी’मध्ये महिलांची टक्केवारी ४१.१ टक्के राहिली आहे.
  • ‘आयओसी’चे कामकाज करताना जास्तीत जास्त महिलांना सामावून घेण्याचे ‘आयओसी’चे धोरण असून, त्या दृष्टीने आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे, असे ‘आयओसी’ने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या निवडणुकीत इस्रायलच्या याएल अराद, हंगेरीच्या बलाझ फ्युरेस, पेरुच्या सेसिलिया रोक्साना टेट व्हिलाकोर्टा यांना स्वतंत्र सदस्य म्हणून सामावून घेण्यात आले आहे.

कंत्राटी पदभरतीला उच्च न्यायालयात आव्हान, निर्णय होईपयर्यंत…

  • राज्य शासनाच्यावतीने विविध शासकीय विभागातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कंत्राटी पदभरतीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांच्यावतीने ही जनहित याचिका दाखल केली गेली आहे.
  • कंत्राटी पद्धतीने पदभरतीचा निर्णय घेतल्याने स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांवर अन्याय होणार आहे. खासगी संस्थेच्यामार्फत होणारी कंत्राटी भरतीचा शासन आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. राज्य शासनाच्यावतीने कामगार, ऊर्जा आणि औद्योगिक विभागाची भरती सुरू करण्यात आली आहे. पदभरतीसाठी खासगी कंपन्यांना कंत्राट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पदाच्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची जाहिरात काढली जाणार नसल्याने प्रक्रिया पारदर्शक राहणार नाही.
  • मागील अनेक वर्षांपासून परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही बाब चुकीची आहे. कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविल्यास खासगी कंपनी मनमानी कारभार करतील आणि त्याचा परिणाम गुणवत्तेवर होईल. त्यामुळे कंत्राटी भरती प्रक्रियेचा शासन आदेश रद्द करावा आणि भरती प्रक्रिया थांबवावी अशी मागणी याचिकेत केली गेली आहे. याचिकेवर निर्णय होईपर्यंत प्रक्रियेवर तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे. याचिकाकर्त्याच्यावतीने ॲड. अश्विन इंगोले बाजू मांडतील.

प्रशांत दामले यांना यंदाचे विष्णुदास भावे गौरवपदक

  • मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरवपदक जेष्ठ अभिनेते, नाट्य कलाकार प्रशांत दामले यांना मंगळवारी जाहीर करण्यात आले. गौरवपदक, रोख रक्कम रु. २५ हजार, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे गौरवपदकाचे स्वरूप आहे. ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
  • विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार हा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा पुरस्कार असून नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली ही संस्था गेली ८० वर्षे नाट्यक्षेत्रात कार्य करीत आहे. संस्थेतर्फे ५ नोव्हेंबर रंगभूमीदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगभूमीदिनाचे औचित्य साधून नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीस विष्णुदास भावे गौरवपदक देऊन सन्मानित करणेत येते, अशी माहिती अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितीचे अध्यक्ष अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी दिली.
  • अखिल भारतीय नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबईचे अध्यक्ष. प्रशांत दामले हे सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत, त्यांनी गेली चार दशके असंख्य मराठी नाटके, चित्रपट, आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. ते मराठी चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता, रंगमंच अभिनेता, गायक, पार्श्वगायक, नाट्यनिर्माते आहेत. विनोदी अभिनयासाठी मराठी नाटक आणि चित्रपट जगतात ते परिचित आहेत. कलेच्या प्रवासात त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या नावावर पाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आहेत. त्यांनी नाटकाशिवाय ३७ मराठी चित्रपट आणि २४ दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये ‘आम्ही सारे खवय्ये’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका समाविष्ट आहे. आतापर्यंत त्यांना २० पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, कलारंजन पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विविध पुरस्कार यांचा समावेश आहे.
  • फेब्रुवारी १९८३ पासून आज अखेर १२५०० पेक्षा जास्त नाटकांचे प्रयोग त्यांनी केले आहेत. त्यांची जी गाजलेली नाटके रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत त्यातील काही खालीलप्रमाणे.

तीन सरकारी कंपन्यांना केंद्राकडून टाळे ?

  • केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील तीन कंपन्यांना टाळे लावण्याची शक्यता आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडणार असून त्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील मेटल अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एमएमटीसी), स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एसटीसी) आणि प्रोजेक्ट अँड इक्विपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पीईसी) बंद करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने विशिष्ट उत्पादने आयात किंवा निर्यात केल्या जाण्याच्या श्रेणीतून या (कॅनलायझिंग एजन्सी) कंपन्यांचे नाव वगळल्यानंतर या कंपन्यांना टाळे लागण्याची शक्यता बळावली आहे. केंद्र सरकारने तिन्ही कंपन्यांच्या उपयुक्ततेची तपासणी पूर्ण केली असून, वाणिज्य विभागाने कोणत्याही कॅनलायझिंग एजन्सीची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे.
  • पीईसी ही यंत्रसामग्री आणि रेल्वे उपकरणे निर्यात आणि आयात करण्यासाठी कॅनलायझिंग एजन्सी होती, तर एसटीसी खाद्यतेल, डाळी, साखर आणि गहू यांसारख्या मोठ्या प्रमाणात वापराच्या आवश्यक वस्तूंच्या आयातीसाठी आणि एमएमटीसी ही उच्च दर्जाचे लोह धातू, मॅंगनीज धातू, क्रोम अयस्क, कोप्रा आणि इतर अनेक मौल्यवान धातूंची निर्यात आणि आयात करण्यासाठी कॅनलायझिंग एजन्सी होती.

२०३५ पर्यंत अवकाश स्थानक उभारा! मोदींचे ‘इस्रो’ला आवाहन

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) २०३५ पर्यंत अवकाश स्थानकाची उभारणी करण्याचे आणि २०४० पर्यंत पहिल्या भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
  • ‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी पंतप्रधानांना गगनयान मोहिमेच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ‘इस्रो’ २१ ऑक्टोबर रोजी प्रथमच अंतराळवीर बचाव यंत्रणा आणि इतर उपक्रमांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे.
  • अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची भारताची मोहीम २०२५ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. त्यांनी शुक्र मोहीम आणि मंगळावरील अवतरणासह विविध आंतरग्रह मोहिमांसाठी काम करण्याचे आवाहन केले.

भारतात समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यासाठीची लढाई किती जुनी? जाणून घ्या..

  • समलैंगिक विवाहाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रदीर्घ काळानंतर त्यांचा निर्णय दिला आहे. समलिंगी विवाहांना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली नाही.
  • आमच्या अधिकार क्षेत्रात हे येत नाही म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. समलिंगी विवाहांना भारतात मान्यता मिळाली पाहिजे यासाठीची लढाई ही आजची नाही. तर ही लढाई २००९ पासून सुरु आहे.
  • मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे आणि समलिंगी विवाहांना मान्यता दिलेली नाही.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१८ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.