१९ मे चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१९ मे चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |19 May 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१९ मे चालू घडामोडी

भारतीय विद्यार्थ्यांचा ब्रिटनला आर्थिक फायदा; शैक्षणिक संस्थांचा महत्त्वपूर्ण अहवाल

  • ब्रिटनमधील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसह परदेशी विद्यार्थ्यांमुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर बंधने आणण्यासंबंधी चर्चा सुरू असतानाच हा महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे.
  • पार्टनर अ‍ॅट लंडन इकॉनॉमिक्स या संस्थेने केलेल्या विश्लेषणामध्ये ही महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. ब्रिटनमध्ये परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर निर्बंध आणण्याच्या आणि अभ्यासानंतर नोकरी करण्याच्या व्हिसा अधिकारांमध्ये कपात करण्याच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पार्टनर अ‍ॅट लंडन इकॉनॉमिक्स या संस्थेने द हायर एज्युकेशन पॉलिसी इन्स्टिटय़ूट, युनिव्हर्सिटीज यूके इंटरनॅशनल आणि काप्लन इंटरनॅशनल पाथवेज या शैक्षणिक संस्थांसाठी हे विश्लेषण केले.
  • या विश्लेषणासाठी २०२०-२१ ची आकडेवारी विचारात घेण्यात आली आहे. युरोपीय महासंघाबाहेरून आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमागे ब्रिटनला ९६ हजार पौंडाचा फायदा झाला आहे. परदेशी विद्यार्थ्यांमुळे विद्यापीठांना जागतिक दर्जाचे अध्यापन आणि संशोधन करणे शक्य होते, जे एरवी शक्य झाले नसते. या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यात या विद्यापीठांना आलेल्या यशाची प्रशंसा केली पाहिजे असे पार्टनर अ‍ॅट लंडन इकॉनॉमिक्सचे डॉ. गेवन कॉनन म्हणाले. यासंबंधी नियमांमध्ये बदल करायाचे असतील तर पुराव्यांवर आधारित करावेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
  • परदेशी विद्यार्थ्यांवर जितका खर्च होतो त्याच्या दहा पट त्यांच्याकडून ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. याचा फायदा स्थानिक आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला होतो.

एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन

  • एसटी महामंडळाची पहिली बस नगर ते पुणे अशी १ जून १९४८ रोजी धावली. या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे काल‌, बुधवारी रात्री नगर शहरातील माळीवाडा भागातील राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. एसटी महामंडळाच्या धावलेल्या पहिल्या बसचे वाहक ते गेल्यावर्षी धावलेल्या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटक अशा तब्बल ७५ वर्षांचे साक्षीदार लक्ष्मण केवटे होते.
  • आज, गुरुवारी सकाळी नगर शहरातील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एसटी महामंडळाच्या वतीने विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळे तसेच महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली अर्पण केली. नगर जिल्ह्यातील सर्व आगारातून लक्ष्मण केवटे या पहिल्या वाहकाला श्रद्धांजली अर्पण करणारे फलक लावण्यात आले आहेत.
  • एसटी महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी सकाळी ८ वा. धावली. ३० असनांची क्षमता होती. बेडफोर्ड कंपनीची बनावट होती. या प्रवासात चास, सुपे, शिरूर, लोणीकंद या ठिकाणी प्रवाशांनी बसला थांबवले व प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली. खाजगी बससेवा देणारे महामंडळाच्या बसला विरोध करतील, ही शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या पहिल्या बसला पोलीस बंदोबस्तही देण्यात आल्याची आठवण त्यांनी सांगितली होती.

संसदेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण कधी होणार? लोकसभा सचिवालयाकडून मोठी अपडेट

  • गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन कधी होणार? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. येत्या २६ मे रोजी या शपथविधीला नऊ वर्षे पूर्ण होतील. हेच औचित्य साधून मोदी नव्या संसदेच्या इमारतीचे लोकार्पण करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
  • पण आता संसदेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण कधी होणार? याची तारीख समोर आली आहे. २८ मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाचं लोकार्पण करणार आहेत. लोकसभा सचिवालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
  • ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी मोदींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित केलं आहे. नवीन संसद भवनाचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. संसदेची नवीन इमारत आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असेल, असं लोकसभेच्या सचिवालयाने सांगितलं.

संसदेच्या नव्या इमारतीसाठी १ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च

  • संसदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन डिसेंबर २०२० मध्ये झाले होते. सध्याच्या संसदेच्या इमारतीच्या बाजुलाच ही नवी इमारत बांधण्यात येत आहे. एचसीपी डिझाईन्स, अहमदाबाद कंपनीचे वास्तूविशारद बिमल पटेल यांच्या देखरेखीखाली या इमारतीचे बांधकाम केलं जात असून इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडकडून केले जात आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी साधारण १ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. विशेष म्हणजे या इमारतीत एकूण ५ हजार कलाकृती असणार आहेत. त्रिकोणी आकार असलेली ही चार मजली इमारत एकूण ६४ हजार ५०० स्केअर किलोमीटर परिसरात वसलेली आहे.

Vodafone-Idea लवकरच लॉन्च करू शकते ५ जी नेटवर्क, जाणून घ्या सविस्तर

  • भारतामध्ये सध्या Reliance Jio, Airtel आणि Vodafone -Idea या तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. यामध्ये जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी आपले ५ जी नेटवर्क देशभरामध्ये सुरु केले आहे. याचा वापरकर्त्यांना मोठा फायदा होत आहे. आता तिसरी मोठी कंपनी व्होडाफोन -आयडिया देखील आपले ५जी नेटवर्क लॉन्च करण्यासाठी तयार आहे. वोडाफोन आयडिया त्यांची ५जी सेवा सुरु करण्यासाठी निधीची तरतूद करत असून लवकरच ५जी सेवेचा लाभ वापरकर्त्यांना मिळणार आहे.
  • दूरसंचार विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, व्हीआय कंपनी जून महिन्यापर्यंत निधी जमवू शकते. त्यानन्तर ५जी सेवा लॉन्च होऊ शकते. कंपनीने तिसऱ्या तिमाहीसाठी परवाना शुल्क आधीच क्लीअर केले आहे. त्यामुळे व्हीआय ५ जी ची स्पर्धा थेट जिओ आणि एअरटेलशी होणार आहे. याबाबतचे वृत्त  The New Indian Express ने दिले आहे.
  • आणखी एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे, व्हीआय फिनलँडची टेक कंपनी नोकियाशी ५जी उपकरणांबाबत चर्चा करत आहे. तसेच व्हीआय ५ जी चे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी नोकियाची मदत मिळू शकते. महत्वाचे नोकिया हा जिओ आणि एअरटेलचा देखील पुरवठादार आहे. व्हीआयची ५जी चाचणी आधीच पूर्ण झाली आहे. म्हणजेच ५जी सेवा लॉन्च होताच वापरकर्त्यांना ते वेगाने रोलआऊट करता येईल.
  • जेव्हापासून जिओ आणि एअरटेल यांनी आपली ५जी सेवा सुरु केली आहे. तेव्हापासून त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर दुसऱ्या बाजूला व्हीआयच्या वापरकर्त्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. ५जी स्पीडचा वापर करण्यासाठी अनेकांनी आपले व्हीआय कार्ड पोर्ट करून घेतले. ५जी लॉन्च केल्यानंतर व्हीआय आपल्या वापरकर्त्यांची संख्या राखू शेकेल अशी अपेक्षा आहे.

राज्यात विजेची मागणी २८ हजार मेगावॅटवर

  • राज्यातील अनेक भागात तापमान वाढल्याने विजेची मागणी २८ हजार मेगावॅटवर गेली आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीकडून १० हजार मे.वॅ.हून अधिक वीज निर्मिती केली जात आहे.
  • महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी उन्हाळ्यात विजेच्या मागणीत होणारी वाढ लक्षात घेऊन ‘मिशन औष्णिक ८००० मेगावॅट’ चे उद्दिष्ट निश्चित केले होते. राज्यात यावर्षी एप्रिल महिन्यात विजेची मागणी २९ हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली होती. मे महिन्यात ती २८हजार मेगावॅटवर गेली. पुढच्या काही दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने सर्व संसाधनांचे नियोजन केले.
  • १७ मे २०२३ रोजी रात्री ७.४५ वाजता एकूण १० हजार ७० मेगावाट वीज निर्मितीचा पल्ला गाठला. यापूर्वी १७ मार्च रोजी रात्री ८ वाजता १० हजार १०२ मेगावॅट वीज निर्मितीचा उच्चांक गाठला होता. सध्या महानिर्मितीच्या सर्व संचांतून वीजनिर्मिती सुरू आहे. त्यामुळे विजेची वाढीव गरज भागवण्यास मदत होत असल्याचा दावा महानिर्मितीने केला आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१९ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.