२१ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२१ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 21 September 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२१ सप्टेंबर चालू घडामोडी

ऑस्करसाठी भारताकडून गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ची निवड:

  • चित्रपटांसाठीचा सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे यंदा ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. भारतीय चित्रपट महामंडळाने (एफएफआय) मंगळवारी याबाबत घोषणा केली. सौराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एका मुलाचे चित्रपटांवरील प्रेम ‘छेल्लो शो’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
  • ‘छेल्लो शो’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांचे असून १४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला होता. ‘‘ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे कोणता चित्रपट पाठवायाचा याबाबत दीर्घ चर्चा झाली. एस. एस. राजमौलीचा ‘आरआरआर’, रणबीर कपूर अभिनित ‘ब्रह्मास्त्र’, विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ आणि आर. माधवन यांचे दिग्दर्शन असलेला ‘रॉकेटरी’ या चित्रपटांवर चर्चा झाल्यानंतर ‘चेल्लो शो’ या चित्रपटाची एकमताने निवड करण्यात आली,’’ असे एफएफआयचे अध्यक्ष टी. पी. अगरवाल यांनी सांगितले.
  • ऑस्कर पुरस्कार सोहळा १२ मार्च २०२३ रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे.

‘ईडी’ची नवी ओळख:

  • ३ जुलै २०२२- महाराष्ट्रात नवे युती सरकार आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी झालेल्या अधिवेशन सत्रात ‘ईडी’..‘ईडी’..असा घोष सभागृहात करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांच्या गटाने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईमुळे भाजपशी हातमिळवणी केली, असे विरोधकांना सूचित करायचे होते.
  • ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने न्यायालयीन दस्तावेज, ‘ईडी’ची निवेदने आणि गेल्या १८ वर्षांतील दाखल गुन्हे, अटक, छापे किंवा चौकशी अहवालांची तपासणी केली. त्यावरून असे दिसते, की ‘ईडी’ची नवी ओळख फारशी चुकीची नाही. या काळात तब्बल १४७ राजकीय नेत्यांची चौकशी करण्यात आली. यापैकी ८५ टक्क्यांहून अधिक नेते विरोधी पक्षांचे होते. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने गेल्या १८ वर्षांत ‘सीबीआय’ने केलेल्या कारवाईविषयी केलेल्या तपशीलवार अभ्यासातही हेच साम्य आढळले. 
  • २०१४ मध्ये ‘एनडीए’ सरकार सत्तेवर आल्यानंतर ‘ईडी’ने विरोधी पक्ष नेत्यांसह त्यांच्या आप्तस्वकीयांच्या केलेल्या चौकशीतही झपाटय़ाने वाढ झाली. १२१ दिग्गज राजकीय नेत्यांवर ‘ईडी’ची कारवाई झाली असल्याचे या तपासणीत दिसले. या काळात ‘ईडी’ने ११५ प्रमुख विरोधी नेत्यांवर गुन्हे दाखल केले, छापे टाकले, चौकशी केली किंवा अटक केली. हे प्रमाण ९५ टक्क्यांवर जाते. ‘सीबीआय’च्या तुलनेत एक तृतीयांशपेक्षा कमी कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे ‘ईडी’ने ही कारवाई केली. हे चित्र ‘यूपीए’ राजवटीच्या (२००४ ते २०१४) चित्राविरुद्ध आहे. या काळात ‘ईडी’ने अवघ्या २६ राजकीय नेत्यांची चौकशी केली होती. यामध्ये १४ (५४ टक्के) विरोधकांचा समावेश होता.
  • २००५ मध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) लागू झाल्यानंतर ‘ईडी’च्या कारवाईच्या प्रकरणांत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. त्याअंतर्गत जामिनासाठी कडक अटींसह इतर तरतुदींमुळे आता अटक करण्याचा, आरोपीची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार ‘ईडी’ला मिळाला आहे. ‘ईडी’च्या तपास अधिकाऱ्यांसमोर नोंदवलेला जबाब पुरावा म्हणून न्यायालयात स्वीकारला जातो.

चेतना सिन्हा यांचा अमेरिकेत बिल क्लिंटन यांच्या हस्ते सन्मान:

  • वाई येथील माण देशी महिला बँक व माण देशी फौंडेशनच्या माध्यमाने  ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल साक्षर करण्यास दिलेल्या योगदानाची दखल घेऊन श्रीमती चेतना सिन्हा यांना अमेरिकेतील ‘क्लिंटन ग्लोबल इनिशियेटिव्ह’ कार्यक्रमात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन व माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 
  • जागतिकहवामान बदलाचे परिणाम आज ग्रामीण भागामध्ये विशेषत: शेती व्यवसायावर जाणवत आहेत. यापुढे या समस्येवर काम करण्याचा मानस ‘क्लिंटन ग्लोबल  इनिशियेटिव्ह’ या कार्यक्रमात श्रीमती सिन्हा यांनी व्यक्त केला.
  • भारतातील माण देशामधील ग्रामीण भागातील हवामानातील बदल व त्याचा पिकांवर होणाऱ्या परिणामावर या समस्येचे निवारण करणे गरजेचं आहे.  ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल साक्षर करण्याचा जो उपक्रम माण देशी राबवित असून त्याची दहा लाख महिलांपर्यंत व्याप्ती कशी होत गेली. या उपक्रमामुळे दहा लाख ग्रामीण भागातील महिलांचे आयुष्य कसे बदलत गेले याबद्दल सविस्तर माहिती श्रीमती सिन्हा यांनी सांगितली.  
  • याबरोबरच माण देशी ग्रामीण तरुण मुलींना खेळाच्या माध्यमातून जागतिक स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. करोनाच्या साथीच्या संकटानंतर ग्रामीण भागातील आरोग्य सेवेतील त्रुटी निदर्शनास आल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी माण देशीने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातही सेवा कार्य सुरू केले असल्याची माहिती  दिली.

एक ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या नियमात होणार मोठे बदल, आयसीसीची ट्विटरवर मोठी घोषणा:

कसे असतील आयसीसीचे नवे नियम

  • खेळाडू चेंडूवर थुंक लावू शकणार नाहीत. हा नियम गेल्या दोन वर्षांपासून लागू असून भविष्यातही तो कायम राहणार आहे.
  • फलंदाज झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकवर खेळायला येईल. बाद झालेल्या फलंदाजाच्या बाजू (क्रीज) बदलण्यानं किंवा न बदलण्याचा काहीच फरक पडणार नाही. यापूर्वी फलंदाज झेल बाद होण्यापूर्वी स्ट्राईक चेंज झाल्यानंतर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकवर यायचा.
  • मर्यादित आणि कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजाला दोन मिनिटांच्या आत स्ट्राइक घ्यावा लागेल. तर, टी२० मध्ये त्याची वेळ मर्यादा ९० सेकंद आहे. यापूर्वी एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात येणाऱ्या दुसऱ्या फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन मिनिटे मिळायची. फलंदाज दोन मिनिटाच्या आत स्ट्राईक घेऊ न शकल्यास विरोधी संघाचा कर्णधार वेळ संपल्याची (टाईम आऊटची) मागणी करण्यास पात्र असेल.
  • गोलंदाजी करताना चेंडू खेळपट्टीबाहेर पडल्यास त्याला डेड म्हणून घोषित केला जाईल. तसेच फलंदाजाला खेळपट्टी सोडण्यास भाग पाडणारा कोणताही चेंडू अवैध (नो-बॉल) ठरवला जाईल.
  • गोलंदाजीसाठी धावण्याच्या दरम्यान, क्षेत्ररक्षणाच्या बाजूने कोणत्याही प्रकारची अनुचित कृती केल्यास, पंच त्या चेंडूला डेड बॉल तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड देऊ शकतात.
  • जर गोलंदाजानं गोलंदाजी करण्यापूर्वी साथीदार फलंदाज (नॉन-स्ट्रायकर) क्रीझमधून बाहेर पडला आणि गोलंदाजानं फलंदाजाला धावबाद केल्यास त्याला बाद घोषित केलं जाईल. यापू्र्वी असं केल्यास फलंदाजावर अन्याय झाला असं मानलं जायचं.
  • टी२० प्रमाणेच आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही षटक वेळेवर पूर्ण न झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ३० यार्डच्या आत अतिरिक्त एक खेळाडू ठेवावा लागेल.

ज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा – प्रज्ञानंदची दमदार कामगिरी:

  • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नामांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या ज्युलियस बेअर जनरेशन चषक ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेची दमदार सुरुवात केली. त्याने सुरुवातीचे सलग तीन सामने जिंकले, पण चौथ्या सामन्यात त्याला अमेरिकेच्या १५ वर्षीय ख्रिस्तोफर योकडून पराभव पत्करावा लागला.
  • १७ वर्षीय प्रज्ञानंदने पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये अनुक्रमे वॅसिल इव्हान्चुक, यान क्रिस्टोफ-डुडा आणि बोरिस गेलफंड या अनुभवी खेळाडूंवर मात केली. त्यामुळे आठ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसअखेर प्रज्ञानंद गुणतालिकेत अन्य तीन खेळाडूंसह दुसऱ्या स्थानावर होता.
  • जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने तीन सामने जिंकत आणि एक लढत बरोबरीत सोडवत गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले. मॅग्नसने भारताच्या अर्जुन एरिगेसीवरही मात केली. मात्र, अर्जुनने पहिल्या फेरीतील पराभवानंतर दमदार पुनरागमन करताना सलग तीन लढती जिंकल्या.

सनदी अधिकाऱ्याची अनुच्छेद 370 रद्द करण्याविरोधातील याचिका मागे:

  • काही महिन्यांपूर्वी भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस.) पुनर्नियुक्ती झालेल्या शाह फैजल यांनी अनुच्छेद 370 रद्द करण्यात आल्याविरोधातील आपली सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली आहे.
  • सनदी सेवेबाहेर पडलेल्या शाह यांना या वर्षी एप्रिलमध्ये पुन्हा या सेवेत घेण्यात आले आहे.
  • त्यांची नियुक्ती सांस्कृतिक खात्यात उपसचिवपदी करण्यात आली आहे.
  • जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा राज्यघटनेतील अनुच्छेद 370 रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर त्याविरोधात 23 याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

भारतीय लष्कराने सियाचीन येथे उपग्रह आधारित इंटरनेट बसवले

– भारतीय लष्कराने 18 सप्टेंबर 2022 रोजी जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर उपग्रह ब्रॉडबँड-आधारित इंटरनेट सेवा सक्रिय केली.
– भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL), भारत सरकारच्या उपक्रमाने सियाचीन ग्लेशियर सीमेवर उपग्रह इंटरनेट सेवा प्रदान केली आहे.

भारतीय लष्कराने सियाचीन येथे उपग्रह आधारित इंटरनेट बसवले

जपान-भारत सागरी सराव JIMEX 2022

– भारतीय नौदलाद्वारे आयोजित JIMEX 22, जपान भारत सागरी सराव 2022 ची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात संपन्न झाली.
– दोन्ही बाजू प्रगत स्तरावरील पाणबुडीविरोधी युद्ध, हवाई संरक्षण सराव आणि शस्त्र गोळीबारात सामील होत्या.

जपान-भारत सागरी सराव JIMEX 2022

नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2022 रोजी नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी (NLP) लाँच केली.
– या प्रकल्पाचा उद्देश देशभरातील वस्तूंच्या अखंडित वाहतुकीला प्रोत्साहन देणे आणि देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय वस्तूंची स्पर्धात्मकता सुधारणे हे आहे.
– इतर विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात लॉजिस्टिक खर्च जास्त असल्याने सरकारला राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण आणण्याची गरज वाटली.

INS अजय बंद करण्यात आली

– 19 सप्टेंबर 2022 रोजी INS अजय 32 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर बंद करण्यात आली.
– नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे पारंपारिक पद्धतीने हा सोहळा पार पडला.
– राष्ट्रीय ध्वज, नौदल पताका आणि जहाजाचा डिकमिशनिंग पेनंट सूर्यास्ताच्या वेळी शेवटच्या वेळी खाली उतरवण्यात आला.
– हे 24 जानेवारी 1990 रोजी पूर्वीच्या USSR मधील पोटी, जॉर्जिया येथे कार्यान्वित करण्यात आले.
– या जहाजाने कारगिल युद्धादरम्यान ऑपरेशन तलवार आणि 2001 मध्ये ऑपरेशन परकम यासारख्या अनेक नौदल ऑपरेशन्समध्ये भाग घेतला.

INS अजय बंद करण्यात आली

महाराष्ट्रातील दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून ‘देवगिरी’ किल्ला करण्यात येणार

– महाराष्ट्राच्या पर्यटन मंत्रालयाने औरंगाबादजवळ असलेल्या दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून देवगिरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
– हे एक राष्ट्रीय वारसा स्मारक आहे, ज्याची देखभाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) करते.
– दौलताबाद किल्ला हा महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळील देवगिरी गावात स्थित एक ऐतिहासिक तटबंदी आहे.
– ही पूर्वी यादव वंशाची राजधानी होती आणि काही काळासाठी दिल्ली सल्तनतची राजधानी होती.
– चौदाव्या शतकात महंमद तुघलकाने किल्ल्याचे नाव दौलताबाद असे ठेवले.

स्वाती पिरामल यांना सर्वोच्च फ्रेंच नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले

– स्वाती पिरामल, उपाध्यक्ष, पिरामल ग्रुप यांना शेवेलियर डी ला लिजियन डी’ऑनर (नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर) प्रदान करण्यात आला आहे.
– सर्वोच्च फ्रेंच नागरी पुरस्कार पिरामल यांच्या उत्कृष्ट कामगिरी आणि व्यवसाय आणि उद्योग, विज्ञान, वैद्यक, कला आणि संस्कृती या क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जातो.
– 2006 मध्ये, तिला फ्रान्सचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान Chevalier de l’Ordre National du Mérite (नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट) देखील प्रदान करण्यात आला.
– महिलांना नेतृत्वाच्या भूमिकेत पाठिंबा देण्यासाठी फ्रेमवर्क आणि धोरणे विकसित करणारी चॅम्पियन म्हणून स्वाती पिरामल या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्मश्री प्राप्तकर्ता आहेत.

स्वाती पिरामल यांना सर्वोच्च फ्रेंच नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले

इंटरनॅशनल वीक ऑफ डेफ पीपल 2022: 19 ते 25 सप्टेंबर 2022

– दरवर्षी, सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी संपणारा पूर्ण आठवडा इंटरनॅशनल वीक ऑफ द डेफ (IWD) म्हणून पाळला जातो.
– 2022 च्या इंटरनॅशनल वीक ऑफ डेफ पीपलची थीम “सर्वांसाठी सर्वसमावेशक समुदाय तयार करणे” आहे.
– हा वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ (WFD) चा एक उपक्रम आहे आणि प्रथम 1958 मध्ये रोम, इटली येथे सुरू करण्यात आला.

जपानमधील भयानक टायफून नानमाडोल

– टायफून नानमाडोल हे जपानमध्ये वर्षानुवर्षे आलेले सर्वात मोठे वादळ आहे.
– पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी न्यूयॉर्कला रवाना होण्यास विलंब केला आहे, जिथे ते संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण देणार आहेत.
– जपान मेटोलॉजिकल एजन्सी (जेएमए) ने लोकांना अत्यंत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे आणि मुसळधार पाऊस, उंच लाटा, वादळ आणि वादळासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२१ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.