३० डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
३० डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |30 December 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

३० डिसेंबर चालू घडामोडी

विराट कोहलीने रचला इतिहास! १४६ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

  • सेंच्युरियनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि ३२ धावांनी गमावला. त्यामुळे टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. दरम्यान विराट कोहलीने २०२३ साली एक असा विक्रम आपल्या नावावर केला आहे, जो १४६ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने केला नाही. सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक धावा करणारा महान खेळाडू सचिन तेंडुलकरही आपल्या कारकिर्दीत असा विक्रम करू शकला नाही.

विराट कोहलीने रचला इतिहास –

  • खरंतर, विराट कोहलीने २०२३ सालची शेवटची इनिंग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे झालेल्या कसोटी सामन्यात खेळली होती. या डावात कोहलीने ७६ धावा केल्या आणि या धावांसह विराट कोहली २०२३ मध्ये २००० हून अधिक धावा करणारा खेळाडू ठरला. यामध्ये तिन्ही फॉरमॅटच्या धावांचा समावेश आहे. विराट कोहलीने यावर्षी एकूण २०४८ धावा केल्या आहेत. २०२३ मध्ये २००० हून अधिक धावा केल्यानंतर, विराट कोहली सात कॅलेंडर वर्षांत २००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. या अगोदर हा विक्रम सहावेळा २०००हून अधिक धावा करणाऱ्या कुमार संगकाराच्या नावावर आहे.

सातव्यांदा दोन हजारांपेक्षा जास्त धावा केल्या –

  • विराट कोहलीने २०१२ मध्ये पहिल्यांदा २००० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१६ ते २०१९ अशी सलग चार वर्षे विराट कोहलीने २००० हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला. मात्र, २०१९ नंतर विराट कोहलीची बॅट शांत झाली आणि त्यानंतर पुढील तीन वर्षे विराट कोहलीच्या बॅटने तशी कामगिरी केली नाही, ज्यासाठी तो ओळखला जातो. या काळात विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक झळकले नाही, पण २०२२ मध्ये झालेल्या आशिया चषकादरम्यान विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध शतकाचा दुष्काळ संपवला आणि आपल्या टी-२० कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले.

कोहलीने कोणत्या वर्षात २००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, ते जाणून घेऊया.

  • १. २०१२ मध्ये २१८६ धावा केल्या
  • २. २०१४ मध्ये २२८६ धावा केल्या
  • ३. २०१६ मध्ये २५९५ धावा केल्या
  • ४. २०१७ मध्ये २८१८ धावा केल्या
  • ५. २०१८ मध्ये २७३५ धावा केल्या
  • ६. २०१९ मध्ये २४५५ धावा केल्या
  • ७. २०२३ मध्ये २०४८ धावा केल्या

देशातील प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांना परदेशांत मागणी

  • देशातून होणाऱ्या कृषी निर्यातीत प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांचा वाटा वाढला आहे. एकूण कृषी निर्यातीत २०१४-१५मध्ये प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांचा वाटा १३.७ टक्के होता, तो २०२२-२३मध्ये २५.६ टक्क्यांवर गेला आहे. देशात अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना दिल्याचा सकारात्मक परिणाम निर्यातीवर दिसून आला आहे.
  • केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासारख्या योजनांच्या माध्यमातून देशात खाद्यप्रक्रिया उद्योगाला चालना मिळाली आहे. सन २०१४-१५मध्ये देशातील अन्नप्रक्रिया उद्योगाचे एकूण मूल्य १.३४ लाख कोटी रुपये होते, ते २०२१-२२मध्ये २.०८ लाख कोटींवर गेले आहे. एप्रिल २०१४ ते मार्च २०२३ या काळात देशातील अन्नप्रक्रिया उद्योगात ६,१८५ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. खाद्यप्रक्रिया उद्योगात झालेल्या या उलाढालीमुळे देशातून होणाऱ्या कृषी निर्यातीत प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांचा वाटा २५.६ टक्क्यांवर गेला आहे.
  • आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत स्थानिक शेतीमालावर प्रक्रिया उद्योग वाढीस लागावा, यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. केंद्र सरकारच्या वतीने २०२० ते २०२५ या काळात १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एक जिल्हा, एक उत्पादन या योजनेंतर्गत देशातील दोन लाख संस्था, प्रक्रियादारांना एकत्र बांधण्याचे धोरण आहे.
  • देशातील १.३५ लाख बचत गटांना थेट निधी
  • जानेवारी २०२३ पासून आजवर देशातील ५१,१३० प्रक्रियादारांना सवलतीत कर्ज, अनुदान, मूल्यवर्धन आणि निर्यात साखळीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. १.३५ लाख स्वयंसहायता बचत गटांना ४४०.४२ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे, असेही केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्रालयाने म्हटले आहे.

बेरोजगारी, महागाईच्या समस्येचं काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात…

  • पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी आता अवघे काही महिने उरले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रीय स्तरावर एकीकडे भाजपाप्रणीत एनडीए तर दुसरीकडे विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता दिसत आहे. त्यातच विरोधकांनी आपल्या सभा व जाहीर भाषणांमधून मोदी सरकारवर सातत्याने टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषत: देशातील बेरोजगारी व महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना परखड सवाल केले असून त्यासंदर्भात मोदींच्या उत्तराची अपेक्षा सगळ्यांनीच ठेवली होत. त्यावर इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका मांडली आहे.
  • या मुलाखतीमध्ये मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात भारतातील वेगवेगळ्या समस्यांबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. देशातील बेरोजगारी व महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान पेटवलं आहे. भाजपाकडून हे सारे आरोप वेळोवेळी फेटाळण्यात आले असले, तरी मोदींनी अद्याप यावर जाहीरपणे भाष्य केलेलं नव्हतं. आता या मुलाखतीच्या निमित्ताने मोदींनी विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

  • मोदींनी यावेळी महागाईच्या मुद्द्यावर भाष्य केलं. “आपण थोडा वेळ यावर होणारे आरोप बाजूला ठेवुयात आणि तथ्यांवर बोलू. या काळात दोन वर्षं न भूतो न भविष्यती असं करोनाचं संकट उद्भवलं होतं. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटामुळे अर्थव्यवस्थेची साखळी विस्कळीत झाली होती. अनेक देशांमध्ये मंदीसदृश्य परिस्थिती होती. मात्र तरीही भारतानं या संकटाशी उल्लेखनीय ठरावा असा सामना केला आणि आपली पत राखली”, असं मोदी यावेळी म्हणाले.
  • “जागतिक पातळीवरचं संकट, गंभीर आव्हानं, विस्कळीत झालेली पुरवठा साखळी, भौगोलिक व राजकीय स्तरावर निर्माण झालेले वाद यामुळे जगभरात मूलभूत गरजेच्या गोष्टींच्या किमतीही वाढल्या होत्या. २०१४-१५ ते २०२३-२४ या काळातली सरासरी महागाई ५.१ टक्के होती. २००४ ते २०१४ या काळात हीच महागाई ८.२ टक्क्यांवर होती. मग यापैकी कोणता महागाईचा दर जास्त आहे?” असा सवाल नरेंद्र मोदींनी या मुलाखतीत केला.

पंतप्रधानांच्या भेटीसाठी अयोध्या नगरी सज्ज

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज, शनिवारच्या भेटीसाठी अयोध्या शहर सज्ज झाले आहे. फुले, म्युरल्स आणि सजावटीचे स्तंभ यांनी शहर नटले असून, शहरात सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
  • पुनर्विकसित करण्यात आलेल्या अयोध्या रेल्वे स्थानकाचे आणि नव्या विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी या शहरात येत आहेत.
  • सकाळी पावणेअकराच्या सुमारास अयोध्या विमानतळावर आगमन झाल्यानंतर मोदी थेट अयोध्या रेल्वे स्थानकावर जाऊन त्याचे उद्घाटन करतील. यानंतर ते विमानतळावर परत येतील व नवनिर्मित विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर ते जाहीर सभेला संबोधित करतील. सुमारे तासभर चालणाऱ्या या सभेला दीड लाख लोक हजर राहण्याची अपेक्षा आहे, असे अयोध्येचे विभागीय आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितले.
  • अलीकडेच पुनर्विकसित करण्यात आलेल्या ‘राम पथाच्या’ आणि रेल्वे स्थानक ते विमानतळ या पंतप्रधानांच्या मार्गावरील इतर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना तात्पुरते लाकडी अडथळे उभारण्याचे काम प्रशासनाने गुरुवारी सुरू केले.
  • विमानतळ ते रेल्वे स्थानक या दरम्यानच्या मार्गावर मोदी ‘रोड शो’ करतील आणि अयोध्यावासीयांच्या स्वागताचा स्वीकार करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा आणि ‘अयोध्येच्या पवित्र शहरात स्वागत’ असा संदेश असलेली भव्य पोस्टर्स या शहरातील निरनिराळया प्रमुख ठिकाणी उभारण्यात आली आहेत. राम मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर ‘प्रभू राम की नगरी में आपका स्वागत है’, असा संदेश असलेले प्रचंड पोस्टर लावण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे, राज ठाकरे शरद पवार, आठवले, आंबेडकर यांना राम मंदिराचे निमंत्रण

  • आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात जागा वाटपावरून इंडिया आघाडीमध्ये वाद-प्रतिवाद झाल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवसेना उबाठा गटाने २३ जागांवर दावा केला असून काँग्रेसने एवढ्या जागा शिवसेनेला सोडण्यास विरोध केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जागावाटपाची चर्चा माध्यमांसमोर न करता बंद खोलीत करण्याचे आवाहन केले.
  • दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी मुंबईत धडक देण्याचा मार्ग जाहीर केल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच काँग्रेसचा १३९ वा वर्धापन दिन नागपूर येथे (दि. २८ डिसेंबर) संपन्न झाल्यानंतर त्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

३० डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.