लेफ्टनंट कर्नल अर्देशर अदी बरझोरजी तारापोर (१९ ऑगस्ट, १९२३:मुंबई, महाराष्ट्र – १६ सप्टेंबर, १९६५:चाविंडा, पाकिस्तान) हे भारतीय लष्करातील परमवीर चक्र प्राप्त अधिकारी होते.
पूरा नाम | लेफ़्टिनेंट कर्नल अर्देशिर बर्जारी तारापोरे |
अन्य नाम | आदी |
जन्म | 18 अगस्त, 1923 (बम्बई (अब मुम्बई), महाराष्ट्र) |
शहाद | 16 सितम्बर 1965 (स्थान – चाविंडा, पाकिस्तान) |
सेना | हैदराबाद सेना, भारतीय थल सेना |
रैंक | लेफ़्टिनेंट कर्नल |
यूनिट | द पूना हॉर्स |
सेवा काल | हैदराबाद सेना- 1940-1951 भारतीय सेना- 1951-1965 |
युद्ध | भारत पाकिस्तान युद्ध (1965) |
सम्मान | परमवीर चक्र (1965) |
नागरिकता | भारतीय |
तारापोर यांच्या पूर्वजांना युद्धातील कामगीरीबद्दल शिवाजी महाराजांकडून गुजरातमधील तारापूर व आसपासची शंभर गावे मिळाल्याची आख्यायिका आहे. अर्देशर यांचे आजोबा हैदराबाद येथे स्थलांतरित झाले व तेथे त्यांनी निझामाच्या सैन्यात नोकरी पत्करली.
अर्देशर तारापोर यांना वयाच्या सातव्या वर्षी पुण्यातील सरदार दस्तूर बॉइझ बोर्डिंग स्कूल येथे पाठविण्यात आले. १९४०मध्ये मॅट्रिक झाल्यावर ते हैदराबाद संस्थानच्या सैन्यात दाखल झाले. गोलकोंडा येथे प्रशिक्षण घेउन झाल्यावर त्यांना बंगळूर येथे पाठविण्यात आले. नंतर ते हैदराबादच्या ७व्या पायदळात सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले.
तारापोर यांना पायदळात तैनात केले गेल्याने ते नाखूष होते.
परमवीर चक्र
१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान लेफ्टनंट कर्नल तारापोर यांच्या पूना हॉर्स चिलखती दळातील तुकडीने चाविंडाच्या लढाईत भाग घेतला होता. यात तारापोर यांची तुकडी सियालकोट परिसरातील फिल्लोरा गावावर चालून गेली. तारापोर यांच्याकडे उजव्या फळीची कमान होती. फिल्लोरा आणि चाविंडाच्या मध्ये वझीरवालीकडून चालून आलेल्या मोठ्या पाकिस्तानी चिलखती सैन्याने भारतीयांवर प्रतिहल्ला चढवला. भयानक मारा होत असतानाही तारापोर यांनी आपली व्यूहात्मक जागा सोडली नाही व आपल्या मागे असलेल्या पायदळाचे शर्थीने संरक्षण केले. तारापोर यांचा रणगाडा शत्रूच्या थेट माऱ्यात होता व त्यावर अनेक तोफगोळे पडून तारापोर व त्यांचा चमू जखमी झाला तरीही तारापोर यांनी पराक्रमाची शर्थ करीत नेट लावून धरला. त्यांचे शौर्य पाहून चवताळलेल्या पूना हॉर्सनी पाकिस्तान्यांचा प्रतिहल्ला मोडून काढला व त्यांचे साठ रणगाडे उद्ध्वस्त केले. तारापोरांच्या रणगाड्यावर पडलेल्या एका गोळ्याने त्यास भीषण आग लागली व त्यातच तारापोर यांचा मृत्यू झाला. पूना हॉर्सने पुढे चाल करीत वझीरवाली, जस्सोरण आणि आसपासचा प्रदेश काबीज केला.