योजनेची सुरुवात – 1995- 96
योजनेत कार्यवाही – नववी पंचवार्षिक योजना
उद्देश – ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे.
सामूहिक जीवन विमा योजना ही ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विमा निगम द्वारे लागू केली जाते.
या योजनेंतर्गत 40 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या व्यक्तीसाठी 60 रुपये आणि 40 ते 50 वर्षातील व्यक्तींना 70 रुपये वार्षिक प्रीमियमच्या भरपाईवर 5,000 रुपयांचे जीवन सुरक्षाकवच उपलब्ध केले जाते.
दारिद्र रेषेखालील (BPL) व्यक्तींना प्रीमियमची 50% रक्कम भरावी लागते. उरलेली 50% रक्कम केंद्र व राज्य सरकार यांच्या द्वारे 25- 25% भरली जाते.