१० सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१० सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 10 September 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१० सप्टेंबर चालू घडामोडी

मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प
– अनावरण : पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संयुक्तपणे केले.
– मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प हा 1320MW क्षमतेचा सुपरक्रिटिकल कोळसा-आधारित थर्मल पॉवर प्लांट आहे जो रामपाल, खुलना येथे स्थापित केला गेला आहे.
– बांगलादेशचे पंतप्रधान चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान, भारत आणि बांगलादेश दोन्ही देशांमधील संबंधांना चालना देण्यासाठी सात MOU स्वाक्षऱ्या केल्या.

HDFC बँकेद्वारे गुजरातमध्ये ‘बँक ऑन व्हील्स’चे अनावरण
– बँक ऑन व्हील व्हॅन ही बँकिंग सेवा, बँक नसलेल्या गावांमध्ये घेऊन जाईल.
– बँक ऑन व्हील व्हॅन एचडीएफसी बँकेच्या नव्याने सुरू केलेल्या ग्रामीण बँकिंग व्यवसायांतर्गत, पुढील आर्थिक समावेशासाठी जवळच्या शाखेपासून 10-25 किमी अंतरावर असलेल्या दुर्गम गावांना भेट देईल.
– ग्राहक 21 बँकिंग उत्पादने तसेच सेवा ग्राहकांना या माध्यमातून उपलब्ध होतील.
– ही व्हॅन प्रत्येक ठिकाणी विशिष्ट कालावधीसाठी कार्यरत असेल आणि एका दिवसात 3 गावे कव्हर करेल व आठवड्यातून दोनदा प्रत्येक गावात पोहोचेल

राजस्थान : 100 दिवसांची शहरी रोजगार हमी योजना
– राजस्थान सरकारने ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या MGNREGA च्या धर्तीवर शहरी भागातील गरजू कुटुंबांना 100 दिवसांचा रोजगार देण्यासाठी ही योजना सुरू केली.
– मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यावर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या इंदिरा गांधी शहरी रोजगार योजनेसाठी 2.25 लाखांहून अधिक कुटुंबांनी आधीच नोंदणी केली आहे.
– ९ सप्टेंबर रोजी सुरू होणार्‍या या योजनेत पर्यावरण संरक्षण, पाणी व वारसा संवर्धन, उद्यान देखभाल, तसेच अतिक्रमणे हटवणे, बेकायदेशीर फलक, होर्डिंग्ज, बॅनर आदी कामांचा समावेश असेल.
– या योजनेअंतर्गत स्वच्छता आणि इतर कामेही केली जाणार आहेत. 18 ते 60 वयोगटातील लोक या योजनेसाठी पात्र आहेत.

नीरज चोप्राने डायमंड लीग फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले
– भारताच्या ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने झुरिचमधील प्रतिष्ठित डायमंड लीग फायनलमध्ये ८८.४४ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले.
– टोकियो ऑलिम्पिकमधील 24 वर्षांच्या सुवर्णपदक विजेत्याने, डायमंड लीग फायनलमध्ये झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेज आणि जर्मनीच्या ज्युलियन वेबरला मागे टाकले.

नीरज चोप्राने डायमंड लीग फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले

UNDP मानव विकास निर्देशांक 2021
– UNDP मानव विकास निर्देशांक 2021 मध्ये भारत 191 देशांपैकी 132 क्रमांकावर.
– हे सलग दुसरे वर्ष आहे ज्यामध्ये भारताने आपल्या क्रमवारीत घसरण नोंदवली आहे.
– एचडीआय मानवी विकासाच्या तीन मूलभूत आयामांमध्ये देशाची सरासरी उपलब्धी मोजते : दीर्घ आणि निरोगी जीवन, शिक्षण आणि एक सभ्य जीवनमान.
– हे चार निर्देशक वापरून मोजले जाते : जन्माच्या वेळी आयुर्मान, शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे, शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्षे आणि दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न (GNI).

हिंदी लेखक डॉ. असगर वजाहत ३१ व्या व्यास सन्मानाने सन्मानित
– त्यांच्या महाबली नाटकासाठी प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.
– त्यांच्या महाबली नाटकात डॉ. वजाहत यांनी मुघल सम्राट अकबर आणि कवी तुलसीदास यांच्यावर प्रकाश टाकला आहे. खरा महाबली, कवी की सम्राट कोण, याचे उत्तर देण्याचा प्रयत्न तो नाटकाच्या माध्यमातून करतो.

हिंदी लेखक डॉ. असगर वजाहत ३१ व्या व्यास सन्मानाने सन्मानित

पद्मश्री पुरस्कार विजेते कलाकार रामचंद्र मांझी यांचे निधन
– भोजपुरी लोकनृत्य ‘नाच’ मध्ये आठ दशके गाजलेले पद्मश्री पुरस्कार विजेते रामचंद्र मांझी यांचे निधन झाले.
– ते ‘लौंडा नाच’चा एक प्रसिद्ध कलाकार आहेत, जो ‘नाच’चा उप-संच होता, ज्यामध्ये पुरुष स्त्रियांच्या रूपात वेशभूषा करतात.
– म्हातारपणातही त्यांच्या नृत्याच्या आवडीमुळे त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (2017) आणि पद्मश्री (2021) यासह अनेक सन्मान मिळाले आहेत.

केदारनाथ धामने भाविकांच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडले; १२६ दिवसांत तब्बल ११ लाख भक्तांनी घेतले दर्शन:

  • जगप्रसिद्ध केदारनाथ यात्रेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच भाविकांच्या गर्दीने सर्व जुने विक्रम मोडीत काढत, नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यंदा यात्रा काळात प्रथमच १२६ दिवसांत तब्बल ११ लाख भाविकांनी बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले आहे.
  • २०१९ मध्ये सहा महिन्यांत १० लाख यात्रेकरू केदारनाथ धामला पोहोचले होते, मात्र यावेळी यात्रेने सर्व जुने विक्रम मोडले आहेत. अजून दीड महिन्याचा यात्रा कालावधी बाकी आहे. अशा परिस्थितीत केदारनाथला येणाऱ्या भाविकांचा आकडा १३ लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • १६ आणि १७ जून २०१३ रोजी केदारनाथ धाममध्ये घडलेली विनाशकारी आपत्ती क्वचितच विसरता येणार आहे. या भयंकर आपत्तीत केदारनाथमध्ये मोठा विध्वंस झाला होता. ज्यात हजारो लोक मारले गेले. ती भीषण परिस्थिती पाहून यात्रा पुन्हा रुळावर यायला बरीच वर्षे लागतील असे वाटत होते, मात्र पुनर्बांधणीच्या कामामुळे आपत्तीनंतर पुढच्याच वर्षी यात्रा सुरू झाली. तर, आपत्तीनंतर २०१९ मध्ये विक्रमी १० लाख भाविक केदारनाथला पोहोचले होते.
  • त्यानंतर २०२० आणि २०२१ मध्ये करोना महामारीमुळे यात्रा प्रभावित झाली होती. आता केदारनाथ धाम यात्रा २०२२ मध्ये रीतसर सुरू झाली आणि यात्रेने सर्व विक्रम मोडून एक इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच ११ लाख भाविक अवघ्या १२६ दिवसांत केदारनाथला पोहोचले आहेत. अजून दीड महिन्याची यात्रा बाकी आहे. दररोज सात ते आठ हजार भाविक केदारनाथला पोहोचत आहेत. अशा स्थितीत केदारनाथ धामला येणाऱ्या भाविकांची संख्या १३ लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • केदारनाथ धामची यात्रा ६ मे रोजी सुरू झाली. सुरुवातीच्या टप्प्यात काही व्यवस्था विस्कळीत झाल्या होत्या, मात्र जिल्हा प्रशासनाने तातडीने व्यवस्था सुधारली. त्यानंतर प्रवाशांची संख्या वाढत गेली आणि प्रवासी येत राहिले. मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.

विश्लेषण: राणीनंतरचा ब्रिटन..राष्ट्रगीतापासून राष्ट्रध्वजापर्यंत बरंच काही बदलणार, नेमके काय असतील हे बदल :

  • युनायटेड किंगडमच्या राष्ट्रीय जीवनामध्ये राजेशाही हा एक अविभाज्य घटक आहे. राजघराण्याशी संबंधित प्रतिमा, प्रतीके आणि रॉयल सायफर म्हणजे राणी वा राजाच्या आद्याक्षरांच्या चिन्हाचा वापर जनतेच्या दैनंदिन जीवनामध्ये गुंफलेला आहे. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांच्याशी संबंधित या सगळ्या गोष्टींमध्ये, ज्या ७० वर्षे चालत आल्या होत्या, बदल होणार आहेत.

ध्वज आणि संकेत

  • इंग्लंडमधल्या सगळ्या पोलिस स्थानकांमध्ये, नौदलाच्या जहाजांवर, शासकीय कार्यालयांवर जो ध्वज फडकावला जातो त्यावर ‘EIIR’ हे रॉयल सायफर किंवा राणीची आद्याक्षरं लिहिलेली असतात. ब्रिटिश सैन्यही ही आद्याक्षरं सोनेरी अक्षरात लिहिलेले ध्वज दिमाखात फडकावतं. राष्ट्रकुलातले ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारखे देश राणीच्या भेटीदरम्यान ‘E Flag’ फडकावत असत.
  • गार्डियननं दिलेल्या वृत्तानुसार, सध्याच्या ध्वजामध्ये अर्धा हिस्सा इंग्लंडचं तर उर्वरीत प्रत्येकी पाव हिस्सा स्कॉटलंड व आयर्लंडचं प्रतिनिधित्व करतो, यातही आता बदल होणं शक्य आहे. नवीन राजा कदाचित ध्वजामध्ये वेल्सचाही समावेश करू शकतो असं गार्डियननं म्हटलं आहे.

तब्बल ३ वर्षांनी झळकावलं शतक, पण विराटला मात्र नवल नाही; म्हणतो “माझं पुढचं टार्गेट : 

  • यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताने सुपर- ४ फेरीतील श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याविरोधातील सलग दोन सामने गमावळे; ज्यामुळे भारत औपचारिकरित्या या स्पर्धेतून बाहेर पडला. मात्र या स्पर्धेत भारताने संघ म्हणून चांगली कामगिरी केली नसली तरी, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मात्र चांगला खेळ केला. त्याने या स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील ७१ वे षटक झळकावले. तब्बल तीन वर्षांनी केलेल्या या कामगिरीचे मात्र विराट कोहलीला फारसे नवल वाटलेले नाही. आशिया चषक स्पर्धेत मला माझ्या खेळात सुधारणा करायची होती. माझे मुख्य लक्ष्य हे आगामी टी-२० विश्वचषक आहे, असे विराट कोहली म्हणाला.
  • विराटने शतक झळकावल्यानंतर भारतभरातील चाहते चांगलेच खूश झाले आहेत. ठिकठिकाणी त्याच्या नावाने आतषबाजी करण्यात आली. तर काही ठिकाणी केक कापण्यात आले. मात्र विराट कोहलीला त्याच्या या कामगिरीचे फारसे नवल वाटलेले नाही. त्याने “संघ म्हणून आमच्यासाठी हा क्षण खूपच विशेष असा होता. श्रीलंकेविरोधात पराभव झाल्यानंतर सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून मैदानात उतरण्याचे आम्ही ठरवले होते. ही स्पर्धा आमच्यासाठी खूपच महत्त्वाची होती. बाद फेरीमध्ये आमच्यावरील दबाव वाढला होता. या दबावाचा आम्ही सामना केला. मात्र सर्वांनाच माहिती आहे की ऑस्ट्रेलियामध्ये होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धा आमचे लक्ष्य आहे. आम्ही आमच्या खेळात सुधारणा करत आहोत. जे सामने आमच्यासाठी चांगले राहिले नाही, त्या सामन्यांचा आम्ही अभ्यास करू,” असे विराट कोहली म्हणाला आहे.
  • पुढे बोलताना कोहलीने आपल्या शतकी खेळीवरही भाष्य केले. “संघ तसेच व्यवस्थापनासोबत माझा सवांद चांगला आहे. हा संवाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. माझ्या कठीण काळात हा संवाद आणि संघाने दिलेल्या अवकाशामुळे मला सुरक्षित वाायचे. जेव्हा मी परतलो तेव्हा संघासाठी काहीतरी करण्यास उत्सुक होतो,” असे म्हणत कोहलीने भारतीय संघाचे तसेच व्यवस्थापनाचे आभार मानले.

पुढच्या वर्षी लवकर या! २३ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन:

  • करोनाच्या २ वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मागील १० दिवस गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. भरल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पार पडला. तब्बल २३ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.

गणेशभक्त भावूक

  • समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात आली. खास सजावट करण्यात आलेल्या तराफ्यावरून थाटामाटात लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात रवाना झाली. खोल समुद्रात बाप्पाला निरोप देण्यात आला. १० दिवसांसाठी घरातील वातावरण प्रफुल्लित करणारा, घराघरात आनंद आणणारा गणपती बाप्पा आपल्या गावी निघाला. पण यावेळी गणेशभक्त भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

चौपाटीवर अलोट गर्दी

  • पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन घेत आणि आपल्या बाप्पाचं साजिरं रुप डोळ्यात साठवत लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. दरवर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटीपासून, नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी चौपाटीवर अलोट गर्दी लोटली होती. यांत्रिक तराफ्याच्या सहाय्यानं लालबागच्या राजाला खोल समुद्रात निरोप दिला गेला.

लिलिबेट आणि मारगॉट…ब्रिटनच्या मुकुटाचं ओझं वागवणारं नातं:

  • ही गोष्टं आहे राजघराण्यातल्या, दोन गोड बहिणींची. मोठी लिलिबेट (एलिझाबेथ दुसऱ्या) आणि लहान मारगॉट (मार्गारेट). दोघींमध्ये चार वर्षांचं अंतर. जगातली सगळी सुखं पायाशी असलेल्या राजप्रासादात राहायचं, तिथल्या हिरवळीवर मनसोक्त खेळायचं, लाडक्या घोड्यांवर बसून घोडेस्वारीचे धडे गिरवायचे, पाळीव श्वानांना गोंजारायचं, आई-बाबांबरोबर सहलींना जायचं, अगदी स्वप्नवत भासावं असं हे आयुष्य… पण लिलिबेट १० वर्षांची असताना, तिच्या काकांना राजेपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि या चौकोनी कुटुंबाचं भविष्य पूर्णपणे बदलून गेलं.
  • घराबाहेर दंगा करणाऱ्या या मुलींना नॅनी घरात घेऊन आली. घरात गंभीर वातावरण होतं. त्यांचे बाबा आता राजे (किंग जॉर्ज सहावे) झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. लिलिबेटला आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याची जाणीव तत्क्षणी झाली असावी. बाबा राजे म्हणजे त्यांच्यामागे राजघराण्याचा मुकुट तिलाच वागवावा लागणार होता. छोटी मारगॉट मात्र आपल्या भविष्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होती.
  • बहिणी… मग त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या असोत, वा राजप्रासादात वाढलेल्या, त्यांच्या नात्यात काही समान पैलू असतातच. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असं हे नातं. यात एकमेकींविषयी प्रेम तर असतंच, पण त्याच वेळी असूयाही असतेच. लिलिबेट आणि मारगॉटचं नातंही काही वेगळं नव्हतं. त्यांच्या तत्कालीन गव्हर्नेस मेरियन क्रॉफर्ड यांनी ‘द लिट्ल प्रिन्सेसेस’ या पुस्तकात म्हटलं आहे की, या बहिणी अनेकदा एकमेकींशी खेळण्यांवरून आणि कपड्यांवरून भांडत, काहीवेळा मारामारीही करत. कोणीही माघार घ्यायला तयार नसे. मार्गारेट जास्त आक्रमक होती.
  • काहीवेळा एलिझाबेथ माझ्याकडे येऊन हातावर चावा घेतल्याचे व्रण दाखवत तक्रार करत असे. दोघींनाही रात्री त्यांच्या बाबांकडून एक-एक चमचा बार्ली शुगर दिली जात असे. मार्गारेट सगळी शुगर एकदम तोंडात कोंबत असे. लिलिबेट मात्र आरामात चवीचवीने खात असे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१० सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.