२३ मे चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२३ मे चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |23 May 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२३ मे चालू घडामोडी

नीरज चोप्राने पुन्हा देशाची शान वाढवली, बनला जगातील नंबर वन भालाफेकपटू

  • वर्ल्ड अॅथलेटिक्सनुसार जारी केलेल्या नवीन रॅंकिंगमध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत जगातील नंबर वन खेळाडू बनला आहे. नीरज चौप्राला पहिल्यांदाच हा किताब मिळाला असून त्याने पुन्हा एकदा देशाचं नाव उज्ज्व केलं आहे.
  • नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिल्यांदा ट्रॅक अॅंड फिल्ड इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल (सुवर्ण पदक) जिंकण्याची कमाल केली होती.
  • ताज्या रॅंकिंगच्या माहितीनुसार, नीरज चोप्राला १४५५ गुण मिळाले आहेत. जे आताचा वर्ल्ड चॅम्पियन एंडरसन पीटर्सच्या २२ अंकांनी जास्त आहेत. एंडरसनच्या नावावर सध्याच्या घडीला १४२२ गुण आहेत.

दोन हजारांच्या नोटा कशा बदलायच्या? तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

मागच्या आठवड्यात दोन हजारांच्या नोटा वितरणातून बाहेर करण्याचा निर्णय झाला आहे. आपल्याजवळ असलेल्या दोन हजारांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बदलण्याची मुदत आहे. २०१६ मध्ये नोटबंदीचा निर्णय झाला. त्यावेळी ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. आता २ हजारांच्या नोटाही बदलून घ्यायच्या आहेत. दोन हजारांच्या नोटा बदलून कशा घ्यायच्या आहेत? त्याविषयीच्या नऊ प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत

  • १) २ हजार रुपयांच्या नोटा काही वर्षांपूर्वी बंद झालेल्या ५०० आणि हजार रुपयांच्या नोटांप्रमाणे बाद झाल्या आहेत का?
  • उत्तर- दोन हजारांच्या नोटा या चलनातून बाद झालेल्या नाहीत तर त्या वितरणातून बाद झाल्या आहेत. दोन हजारांची नोट ही वैध असणार आहे.
  • २) २ हजार रुपयांच्या फक्त १० नोटा म्हणजे फक्त २० हजार रुपयेच बदलता येणार का?
  • उत्तर : RBI ने केलेल्या घोषणेनुसार एका वेळी २ हजार रुपयांच्या १० नोटा बदलता येतील. एका वेळी, एका व्यक्तीला २ हजार रुपयांच्या १० नोटाच बदलता येणार आहे. समजा एखादा व्यक्ती एकाऐवजी जास्त वेळा बँकेत आला आणि नोटा बदलू लागला तर तसं करण्याला संमती आहे. रांगेत दहावेळा उभं राहून २ हजारांच्या १०० नोटाही एखादा व्यक्ती बदलू शकतो.
  • ३) दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी मागच्या वेळी नोटबंदी झाल्यावर जसा फॉर्म भरावा लागला तसा भरावा लागणार?
  • उत्तर : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी फॉर्म भरावा लागणार नाही. तसंच ओळखपत्रही दाखवण्याची आवश्यकता नसणार आहे.
  • ४) दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची काही सीमा आखून देण्यात आली आहे का?
  • उत्तर: दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी एका वेळी १० नोटांची मर्यादा आहे. मात्र एखादा व्यक्ती किती नोटा जमा करतोय त्याची कुठलीही सीमा आखून देण्यात आलेली नाही.
  • ५) दोन हजारांची नोट वैध आहे का? त्याद्वारे व्यवहार केले जाऊ शकतात का?
  • उत्तर : RBI च्या घोषणेनुसार दोन हजारांच्या नोटा वैध आहेत. त्यामुळे या नोटांद्वारे व्यवहार करता येऊ शकतो.
  • ६) बँक खातं नसेल तरीही २ हजारांच्या नोटा बदलता येतील का?
  • उत्तर : होय. बँक खातं नसेल तरीही दोन हजारांच्या नोटा बदलता येणार आहेत. कुठल्या बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत.
  • ७) दोन हजारांच्या नोटा तुमचं खात जिथे असेल तिथेच बदलता येणार का?
  • उत्तर : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी तुमचं खातं आहे तिथेच तुम्हाला नोटा बदलता येतील असं नाही. तुम्ही कुठल्याही बँकेतून तुम्ही नोटा बदलू शकता.
  • ८) ज्येष्ठ नागरिक दोन हजारांच्या १० पेक्षा जास्त नोटा बदलू शकतात का?
  • उत्तर : ज्येष्ठ नागरिकही एका वेळी १० नोटाच बदलू शकतात. ज्येष्ठ नागरिकांना दहाच नोटा बदलता येणार आहेत. वरिष्ठ नागरिकांनाही दहा नोटा कितीहीवेळा बदलता येणार आहेत.
  • ९) दोन हजारांच्या नोटा बदलण्याची मुदत किती आहे?
  • उत्तर : RBI ने केलेल्या घोषणेनुसार ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत या नोटा बदलून घेता येणार आहेत.

तर ही उत्तरं आहेत तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची. २३ मे पासून नोटा बदलता येणार आहेत. मात्र मुळात हा फरक लक्षात घ्या की ही नोट बंद झालेली नाही. फक्त वितरणातून बाहेर गेली आहे. NDTV ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

सातारा: पुस्तकांचे गाव भिलार हे देशासाठी आदर्श गाव; राज्यपाल रमेश बैस

  • महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याचे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. राज्यपाल रमेश बैस यांचे साताऱ्यातील महाबळेश्वरच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी वाई हेलिपॅडवर आगमन झाले.यावेळी वाई- खंडाळा – महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील व जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.
  • यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी ते पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या इंडियन रेड क्रॉस सोसायटीने उभारलेल्या वाई येथील बेल एअर हॉस्पिटल ला भेट दिली.तेथे संचालक फादर टॉमी यांनी त्यांचे स्वागत केले.व्यवस्थापक जितीन जोश, डॉ. सुनील पिसे, डॉ. सिजो जॉन, डॉ. मंगला अहीवळे, डॉ. नरेंद्र तावडे, डॉ. शयाल पावसकर, डॉ. रेश्मा नदाफ यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल श्री बैस यांनी रुग्णालयातील विभागांची सविस्तर माहिती घेऊन शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग, लॅबोरेट्री, सिटी स्कॅन, एक्सरे, जनरल वॉर्ड या विभागानं भेट देऊन पाहणी केली.
  • यावेळी फादर टॉमी यांनी रुणालयाच्या कामकाजाची माहिती दिली. या रुग्णालयाने शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने च्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी उपचार सुरू केले आहेत. परंतु याची परवानगी मिळाली नसल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले. एवढ्या ग्रामीण भागात असे हॉस्पिटल उभारल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलेयानंतर राज्यपाल श्री बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच सुनिता भिलारे, सदस्य वंदना भिलारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
  • पुस्तकांचे गाव भिलार पहायला मिळाले हे सौभाग्य असल्याची भावना व्यक्त करून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, या गावातील लोकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. देशातील नागरिकांसाठी ज्ञानाचे भांडार खुले केले आहे. आजकालच्या इंटरनेटच्या जगात लोकांचे पुस्तक वाचन कमी झाले आहे. पण या गावात लोकांनी पुस्तकांसाठी राहत्या घरातील जागा दिली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. संपूर्ण गाव म्हणजेच ग्रंथालय असणे ही एक आगळीवेगळी आणि आनंदाची गोष्ट असल्याची भवना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

२,००० च्या नोटेमुळे काळा पैसेवाल्यांनाच मदत -चिदम्बरम

  • माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी दोन हजार रुपयांच्या नोटेसंबंधी घेतलेल्या निर्णयांवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. आधी २०१६ मध्ये २,००० ची नोट आणण्याचा निर्णय मूर्खपणाचा होता, या नोटेमुळे काळा पैसा असणाऱ्यांना सहज पैसे साठवण्यास मदत झाली आणि आता त्यांना त्यांच्या नोटा बदलून देण्यासाठी लाल गालिचे अंथरले जात आहेत, अशी टीका चिदम्बरम यांनी ट्वीट करून केली.
  • रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी २,००० च्या नोटा मागे घेत असल्याचे जाहीर केले. बँकेतून या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा खात्यामध्ये जमा करण्यासाठी ३० सप्टेंबपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
  • त्यासाठी कोणतेही ओळखपत्र, अर्ज आणि पुराव्यांची गरज नाही, असेही बँकेने जाहीर केले आहे. काळा पैसा शोधण्यासाठी या नोटा मागे घेत असल्याचा भाजपचा दावा उघडा पडला आहे, अशी टीका चिदम्बरम यांनी ट्वीटमध्ये केली.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२३ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.