२६ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२६ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 26 December 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२६ डिसेंबर चालू घडामोडी

नेपाळच्या पंतप्रधानपदी प्रचंड यांची निवड: 

  • विरोधी पक्ष सीपीएन-यूएमएल आणि अन्य छोटे पक्ष रविवारी नाटय़मय घटनाक्रमानंतर सीपीएन- माओवादी सेंटरचे  (सीपीएन- एमसी) अध्यक्ष पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांना पाठिंबा देण्यास तयार झाले. त्यामुळे प्रचंड यांचा नेपाळचे पुढील पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला.
  • माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएल, सीपीएन-एमसी, राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी आणि अन्य छोटय़ा पक्षांची एक महत्त्वाची बैठक काठमांडूमध्ये झाली. या वेळी सर्व पक्षांनी ‘प्रचंड’ यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यास सहमती दर्शविली. सीपीएन-एमसीचे सरचिटणीस देब गुरुंग यांनी सांगितले की, सीपीएन-यूएमएल, सीपीएन-एमसी आणि अन्य पक्ष घटनेच्या अनुच्छेद ७६ (२) नुसार १६५ खासदारांच्या स्वाक्षरीसह राष्ट्रपती कार्यालय ‘शीतलनिवास’मध्ये जाऊन प्रचंड यांचा पंतप्रधानपदावरील दावा सादर करण्यास तयार आहेत.
  • राष्ट्रपतींना देण्यासाठी एक करारपत्र तयार करण्यात येत आहे. ओली यांचे निवासस्थान बालकोटमध्ये झालेल्या बैठकीला माजी पंतप्रधान ओली यांच्यासह प्रचंड, आरएसपीचे अध्यक्ष रवि लामिछाने, राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे प्रमुख राजेंद्र लिंगडेन, जनता समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अशोक राय यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. प्रचंड आणि ओली यांच्यात ‘रोटेशन’ पद्धतीने सरकारचे नेतृत्व करण्यास एकमत झाले. त्यानंतर प्रचंड अगोदर पंतप्रधान होण्यास ओली यांनी सहमती दर्शविली.
  • नव्या आघाडीला २७५ सदस्यांच्या प्रतिनिधीगृहातील १६५ सदस्यांचा पाठिंबा आहे. यामध्ये सीपीएन-यूएमएलचे ७८, सीपीएन-एमसी ३२, आरएसपी २०, आरपीपी १४, जेएसपी १२, जनमतचे सहा आणि नागरिक उन्मुक्ती पार्टीचे तीन सदस्यांचा समावेश आहे. सीपीएन-यूएमएलचे सरचिटणीस शंकर पोखरेल यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, सर्वात मोठा पक्ष म्हणून नेपाळी काँग्रेसला राष्ट्रपतींकडून देण्यात आलेल्या कालावधीत नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्यात अपयश आले. आता सीपीएन-यूएमएलने १६५ खासदारांच्या पाठिंब्याने प्रचंड यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे.

शीख धर्मीयांना भरतीसाठी दाढी-पगडीसह मुभा; अमेरिकेच्या नौदलाला न्यायालयाचे आदेश: 

  • अमेरिकेच्या नौदलात भरती करताना शीख धर्मीयांना त्यांच्या दाढी-पगडीमुळे भरती नाकारता येणार नाही, असा निर्णय अमेरिकेतील न्यायालयाने दिला. त्यामुळे तीन शीख धर्मीय प्रशिक्षणार्थीचा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना आता आपल्या धार्मिक श्रद्धांशी तडजोड न करता नौदलात भरती होऊन प्रशिक्षण घेता येईल.
  • आकाश सिंग, जसकीरत सिंग आणि मिलाप सिंग चहल यांनी नौदलाच्या नियमात त्यांच्यासाठी सवलत मागितली होती. आपल्या धार्मिक श्रद्धांनुसार पगडी व दाढी राखण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा त्यांचा युक्तिवाद होता. मात्र ‘मरीन कॉर्प्स’ने या तिघांना स्पष्ट केले, की मूलभूत प्रशिक्षणापूर्वी दाढी-केस कमी करणे अनिवार्य आहे. तरच सेवा देऊ शकतात.
  • कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्राथमिक मनाई आदेशाची विनंती नाकारल्यानंतर त्यांनी सप्टेंबरमध्ये ‘यूएस कोर्ट ऑफ अपील’मध्ये यासंदर्भात दाद मागितली. या न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने शुक्रवारी निकाल दिला. त्यात नमूद केले, की त्यांच्या श्रद्धांचे पालन करण्यासाठी त्यांना खूप त्रास व आघात सहन करावे लागत आहेत. या तिघांचे वकील एरिक बॅक्स्टर यांनी ‘ट्वीट’ संदेशात नमूद केले, की न्यायालयाच्या निर्णयानुसार ‘यूएस मरीन कॉर्प्स’मध्ये सेवा करताना शीख धर्मीय  धार्मिक श्रद्धेनुसार पगडी व दाढी राखू शकतात.

भारताला जगात विशेष स्थान – मोदी:

  • भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणे, करोना प्रतिबंधक लशींच्या २२० कोटींहून अधिक मात्रा देण्यात आलेले व्यापक यश व निर्यात आकडा चार ‘ट्रिलियन डॉलर’पर्यंत पोहोचणे आदी क्षेत्रांतील यशोगाथेचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घेतला. ते म्हणाले, की २०२२ या वर्षांत विविध क्षेत्रात मिळालेल्या यशामुळे जगात भारताने आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. आकाशवाणीच्या मासिक संवाद सत्राच्या ९६ व्या व या वर्षांतील अखेरच्या भागात मोदींनी अनेक देशांमध्ये करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे देशवासीयांचे लक्ष वेधले. या संदर्भात सर्वानी सतर्क, सुरक्षित आणि सावध राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
  • भारताला ‘जी-२०’ राष्ट्रगटाचे अध्यक्षपद मिळाल्याचे सांगून त्यांनी या उपक्रमास देशवासियांनी ‘लोक चळवळ’ बनविण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले, की २०२२ हे वर्ष खरोखरच खूप प्रेरणादायी आणि अनेक अर्थानी अद्भूत होते. या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे ७५ वर्षांची पूर्तता झाली. या वर्षी देशाचा ‘अमृतकाळ’ (७५ ते १०० वर्षांदरम्यानचा काळ) सुरू झाला. या वर्षी देशाला नवी गती मिळाली. २०२२ च्या विविध यशांनी आज संपूर्ण जगात भारताचे एक विशेष स्थान निर्माण झाले आहे. २०२२ मध्ये भारताने जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा गाठला.
  • भारताने २२० कोटी नागरिकांना करोना प्रतिबंधक लशींची मात्रा देण्याची अविश्वसनीय कामगिरी आपण केली. याच वर्षी भारताने निर्यातीत ४०० अब्ज डॉलरचा जादूई आकडा मागे टाकला. २०२२ मध्ये देशवासीयांनी ‘स्वावलंबी भारता’चा संकल्प केल्याचे सांगून मोदी म्हणाले, की देशातील पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ नौदलाच्या सेवेत रुजू झाली.
  • ‘करोनाबाबत सतर्क राहावे’– चीन, जपान, दक्षिण कोरियासह जगातील अनेक देशांमध्ये करोना प्रादुर्भावात वाढ झाल्याचे नमूद करून मोदींनी देशवासीयांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की यावेळी बरेच लोक सुट्टीचा आनंद लुटण्याच्या  तयारीत आहेत.  आनंद भरपूर लुटा, पण थोडे सावधही राहा. मुखपट्टी व नियमित हात धुणे आदी खबरदारी घेतलीच पाहिजे. सावध राहिलो तर आपण सुरक्षित राहू.

‘आधार’संलग्न नसलेले ‘पॅन’ खाते ३१ मार्चनंतर निष्क्रिय: 

  • ज्या नागरिकांनी आपला कायम खाते क्रमांक (पर्मनंट अकाउंट नंबर – पॅन) ‘आधार’शी जोडला नाही, त्यांचे ‘पॅन’ निष्क्रिय केले जाईल, त्यामुळे ‘पॅन’ विनाविलंब ‘आधार’शी जोडून घेण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे.१९६१ च्या प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीनुसार, सवलत श्रेणीत नसलेल्या सर्व ‘पॅन’धारकांनी ३१ मार्च २०२३ पूर्वी आपले ‘पॅन’ ‘आधार’शी जोडणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास १ एप्रिल २०२३ पासून संबंधितांचे ‘पॅन’ निष्क्रिय केले जाईल.
  • केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मे २०१७ मध्ये प्रसृत केलेल्या अधिसूचनेनुसार आसाम, जम्मू-काश्मीर व मेघालयातील रहिवासी, तसेच अनिवासी भारतीय व ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना यात सवलत देण्यात आली आहे.सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस’ने (सीबीडीटी) ३० मार्च रोजी प्रसृत केलेल्या परिपत्रकात नमूद केले, की एकदा ‘पॅन’ निष्क्रिय झाले, की संबंधित व्यक्ती प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीनुसार होणाऱ्या कारवायांसाठी जबाबदार असेल.
  • निष्क्रिय ‘पॅन’ वापरून प्राप्तिकर परतावा भरता येणार नाही. प्रलंबित धन परताव्यांची प्रक्रिया केली जाणार नाही, निष्क्रिय ‘पॅन’मधून प्रलंबित परतावा जारी केला जाणार नाही. सदोष परतावा दुरुस्त केला जाऊ शकत नाही. जास्त दराने जास्त कर आकारला जाईल.

प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांचा देशभर ट्रॅक्टर मोर्चा: 

  • प्रजासत्ताकदिनी देशातील सर्व जिल्ह्यांत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात संसदेवरही मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाची शनिवारी कर्नाल (हरियाणा) येथील गुरुद्वारा डेरा कार सेवा येथे ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक हन्नान मौला यांनी ही माहिती दिली.
  • हन्नान मौला म्हणाले, या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, प्रजासत्ताक दिनी जिल्हास्तरावरील सरकारी कार्यक्रम पार पडल्यानंतर देशभरात जिल्हास्तरावर ट्रॅक्टर रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. याच दिवशी हरियाणातील जिंद येथे किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात येईल. या महापंचायतीमध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात दिल्लीत करावयाच्या आंदोलनाची तारीख आणि रुपरेषा निश्चित करण्यात येईल.

मागण्या काय?

  • शेतमाल हमीभाव कायदा करा
  • शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा
  • शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पेन्शन द्या 
  • शेतीयोग्य जमिनीचे भूसंपादन करू नका 
  • लखीमपूर खेरी हत्याकांडप्रकरणी राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घ्या 
  • नेत्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या

भारताचे मालिकेत निर्भेळ यश: 

  • रविचंद्रन अश्विन (६६ चेंडूंत नाबाद ४२) आणि श्रेयस अय्यर (४६ चेंडूंत नाबाद २९)  यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात तीन गडी राखून रोमांचक विजय नोंदवला. भारताने १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी ४ बाद ४५ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, भारताचे तीन गडी लवकर बाद झाल्याने त्यांची अवस्था ७ बाद ७४ अशी बिकट झाली. यानंतर अय्यर आणि अश्विन यांनी आठव्या गडय़ासाठी १०५ चेंडूंत केलेल्या निर्णायक ७१ धावांच्या अभेद्य भागिदारीमुळे भारताला विजय मिळवता आला.
  • बांगलादेशचा फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराजने (६३ धावांत ५ बळी) प्रभावी मारा केला, मात्र त्याला इतर गोलंदाजांची म्हणावी तशी साथ लाभली नाही. या मालिका विजयामुळे भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेतील आपली स्थिती मजबूत केली आहे. भारताने मालिकेतील पहिला कसोटी सामना १८८ धावांनी जिंकला होता.
  • चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर फिरकी गोलंदाजांनी आपला प्रभाव पाडण्यास सुरुवात केली. भारताने दिवसाच्या दुसऱ्याच षटकात जयदेव उनाडकटला (१३) गमावले. पहिल्या डावात ९३ धावांची खेळी करणाऱ्या ऋषभ पंतने मैदानात येताच आक्रमक पवित्रा घेतला, मात्र नऊ धावांवर त्याला मिराजने बाद केले. यानंतर मिराजने अक्षर पटेलला (३४) माघारी पाठवत भारताच्या अडचणी वाढवल्या. यानंतर मैदानात असलेल्या अश्विन आणि अय्यर सुरुवातीला संयमाने खेळ केला. यादरम्यान, त्यांनी धावसंख्येत भर घालणे सुरूच ठेवले. ही भागीदारी मोडीत काढण्यासाठी बांगलादेशने आपला मोर्चा वेगवान गोलंदाजांकडे वळवला, मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. अश्विनला जीवदानही मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याने उचलला. अश्विनला सामनावीर, तर चेतेश्वर पुजाराला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२६ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.