२७ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२७ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |27 December 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२७ डिसेंबर चालू घडामोडी

राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत नागपूर, मुंबईची बाजी; महिला गटात नागपूर, तर पुरूष गटात मुंबई विजयी

  • वरिष्ठ गटाच्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात नागपूर संघाने पुणे संघाला नमवत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. तर पुरूष गटात मुंबई संघाने नागपूरच्या संघाला पराभूत करत अजिंक्यपद मिळवले. अविष्कार सांस्कृतिक व क्रीडा मंडळ तसेच व्हॉलीबॉल असोसिएशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत ही स्पर्धा बदलापूर पश्चिमेतील बदलापूर जिमखाना येथे रंगली. मानाची समजली जाणारी महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल अजिंक्य पद स्पर्धा नुकतीच बदलापुरात पार पडली. गेल्या ५४ वर्षांच्या इतिहासात मुंबई महानगर प्रदेशात पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान ठाणे जिल्ह्याला आणि बदलापूर शहराला मिळाला.
  • बदलापूर जिमखाना येथील भव्य मैदानात चार दिवस ही स्पर्धा रंगली. स्पर्धेचे उद्घाटन मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे तसेच आयोजक आणि ठाणे व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष किरण भोईर यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत राज्यभरातील ३४ जिल्हा संघांनी आपला सहभाग नोंदवला. पुरूष आणि महिला अशा दोन गटात संपन्न झालेल्या या स्पर्धेत एकूण ९०० खेळाडूंनी सहभाग घेतला. सर्व फेऱ्या पार करत महिला गटात पुणे आणि नागपूर यांच्या अंतिम सामना रंगला. त्यात नागपूर संघाने ३-२ अशा डावात पुणे संघाचा पराभव केला. तर पुरूष गटात नागपूर आणि मुंबई यांच्यात अंतिम लढत झाली. यात मुंबईने सुरूवातीपासून सामन्यावर पकड ठेवत ३-१ असा दणदणीत विजय मिळवला.
  • चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. तर अंतिम सामन्यासाठी क्रीडाप्रेमींनी तुफान गर्दी केली होती. या स्पर्धेदरम्यान विविध खेळांमध्ये शिछत्रपती पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ आणि तरूण खेळांडूंना गौरवण्यात आले. खेळाप्रती जनजागृती निर्माण व्हावी यासाठी शहरात फेरी काढण्यात आली होती. या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनामुळे बदलापूर शहरात असलेल्या क्रीडा सुविधांची आणि खेळाडूंची माहिती राज्याला मिळाली. यातून खेळाला प्रोत्साहन मिळेल अशी आशा ठाणे व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष किरण भोईर यांनी व्यक्त केली.

चावडी : सोलापूर स्मार्ट सिटी की खेडे?

  • एकेकाळी संपूर्ण राज्यात चौथ्या क्रमांकाचे महानगर म्हणून ओळखले गेलेले सोलापूर मोठया प्रमाणावर कापड गिरण्या व सूतगिरण्यांमुळे गिरणगाव म्हणून ओळखले गेले. काही जण याच सोलापूरला उपहासाने खेडयाची उपमा देतात. आज मोदी सरकारच्या कृपेने निकृष्ट दर्जाची का होईना, स्मार्ट सिटी अवतरली तरी सोलापूरला खेडे म्हणण्याची सवय अजूनही कायम आहे. भाजपचे आमदार सुभाष देशमुख हे सोलापूरला अधूनमधून खेडे म्हणूनच संबोधतात. एका कार्यक्रमात त्यांनी सोलापूरला हेच बोल लावले. तेव्हा उपस्थित भाजपचे त्यांचे प्रतिस्पर्धी म्हटले जाणारे आमदार विजय देशमुख यांनी, सुभाषबापू सोलापूरला खेडं का म्हणाले कळले नाही. याच सोलापुरात पूर्वी सोन्याचा धूर निघत होता.
  • सोलापुरी चादरीचे कारखाने प्रसिद्ध होते. शहराचा विकास करणे ही आपण सर्व लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले. स्मार्ट सिटी, शहराभोवती जोडलेले सर्व महामार्गाचे चौपदरीकरण, रेल्वे विकासाचे जाळे, वाढते धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन, वाढता शेती बाजार या गोष्टी पाहिल्या म्हणजे नेमके शहर कोणाला म्हणायचे, असा सवाल एका देशमुखांनी दुसऱ्या देशमुखांना करताना आपल्यातील दुही अद्यापि संपले नसल्याची जणू द्वाहीच फिरविल्याची चर्चा रंगल्याचे कार्यक्रमस्थळी पाहायला मिळाले.

शरद पवार यांना अखेर घराचा ताबा..

  • शिवेंद्रसिंहराजेंनी शरद पवार यांना एका फोनवर मिळवून दिला म्हाडाच्या घराचा ताबा असं हेडिंग  असलेला  संदेश (मेसेज) साताऱ्यात समाज माध्यमांवर आला आणि सगळयांची तो संदेश वाचण्यासाठी उत्सुकता ताणली गेली.तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की, सातारा तालुक्यात पवारांची निगडी नावाचे गाव आहे. येथे शरद पवार नावाचे सीमा सुरक्षा दलातील जवान चीन सीमेवर काम करतात. त्यांचे वडील आप्पा पवार हे गिरणी कामगार असल्याने त्यांना म्हाडाचे घर मंजूर झाले होते.
  • त्यांनी या घराचे सर्व सोपस्कार पूर्ण केले होते, मात्र त्यांना घराचा ताबा मिळत नव्हता. यासाठी शरद पवार यांनी सीमा सुरक्षा दलातून चीन सीमेवरून तीस दिवसाची सुट्टी घेतली होती. सुट्टी संपत आली तरी त्यांना  दाद मिळत नव्हती. म्हणून त्यांनी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना फोनवर एक मेसेज केला.  माझे वडील गिरणी कामगार असून त्यांना घर मंजूर झाले आहे. परंतु त्याचा ताबा अजूनपर्यंत त्यांना मिळालेला नाही, ते वयस्कर असल्याने त्यांना नियमितपणे मुंबईला जाणे येणे शक्य नाही, या कामी आपण लक्ष घालून  माझ्या वडिलांना घराचा ताबा मिळवून द्यावा. यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना ताबा मिळवून दिला. मात्र या विषयीचा समाज माध्यमांवर संदेश आला, शिवेंद्रसिंहराजेंनी शरद पवार यांना एका फोनवर मिळवून दिला म्हाडाच्या घराचा ताबा’ यामुळे सगळयांची उत्सुकता ताणली गेली होती. शिवेंद्रराजे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची साथ सोडली असली तरी आपल्या गावातील शरद पवार यांच्या मदतीला आमदार धावून गेले याचीच चर्चा अधिक सुरू झाली.

प्रत्येकी १२ जागांचा ‘वंचित’चा ठराव; ‘मविआ’कडे समान जागांची मागणी

  • राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली असल्याने त्यांची ताकद स्वबळ लढविण्याची राहिलेली नाही. काँग्रेसची मतदान घेण्याची ताकद दिसत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीबरोबर प्रत्येकी १२ जागा वाटून घेण्याचे सूत्र ठरवावे. हे सूत्र ठरविण्यासाठी उगाच वेळकाढूपणा करू नये. फार तर दोन आठवडयांत निर्णय घ्यावा, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत मांडले.
  • पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात एकत्रपणाने निवडणूक लढवायची असेल तर प्रत्येकी १२ जागांचे सूत्र ठेवावे. अन्य कोणत्याही पक्षाची स्वबळावर लढण्याची ताकद राहिलेली नाही. १२ लोकसभेच्या जागांतील कोणती जागा कोण लढवणार यावर नंतर चर्चा होऊ शकते. पण सूत्र मात्र प्रत्येकी १२ असे असावे असे ठाकूर यांनी सांगितले. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धाथे मोकळे यांची उपस्थिती होती. मोकळे म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत वंचित आघाडीची ताकद वाढली आहे.
  • बुथरचनाही आता पूर्ण झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी वंचितच्या लाखोंच्या सभा होत आहेत. त्यामुळे १२ जागांचे सूत्र समोर मांडले आहे. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत व्यापक चर्चा झाली आहे. १२ जागांपैकी तीन जागांवर मुस्लिम उमेदवार उभे करण्याचा वंचितचा मानस असून अन्य प्रवर्गातील वंचित घटकांनाही योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल, असा दावा ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

राम मंदिर हजारो वर्षे टिकेल! न्यासाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास

  • अयोध्येतील नवे भव्य राम मंदिर हा स्थापत्यशास्त्राचा अद्भुत अविष्कार असेल. कृत्रिम दगडाच्या भक्कम विस्तृत पायावर उभारले जाणारे हे मंदिर एक हजार वर्षे टिकेलच, पण अडीच हजार वर्षांनंतरही मंदिर उभे दिसेल, असा विश्वास निर्माण प्रक्रियेमध्ये सक्रिय असलेले श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे (न्यास) अभियंता गिरीश सहस्रभोजनी यांनी व्यक्त केला.
  • राम मंदिराच्या उभारणीत प्रामुख्याने सक्रीय असलेल्या न्यासाच्या आठ अभियंत्यांपैकी पाच मराठी आहेत. मंदिराचा पाया ६० फूट खोल, ६०० फूट लांब (पूर्व-पश्चिम) व ५५० फूट रुंद (उत्तर – दक्षिण) आहे.
  • मंदिराच्या ढाचा उभारणीच्या जागी वाळू असल्याने ती पूर्णपणे बाजूला करून काँक्रिटचा कमीत कमी वापर करून एक फुटाचे विशिष्ट स्तर तयार करण्यात आले आहेत. असे ४८ स्तर एकावर एक टाकून पाया तयार केल्याचे प्रकल्प मुख्य व्यवस्थापक जगदीश आफळे यांनी सांगितले. विशेष
  • म्हणजे मंदिराच्या निर्माणात लोखंडाचा तसेच जमिनीच्या वर काँक्रिटचा वापर करण्यात आलेला नाही.

अहोरात्र निर्माणकार्य सुरू

  • मंदिरस्थळावर अहोरात्र काम सुरू असून सुमारे चार हजार कामगार, ६५ अभियंते, १२ व्यवस्थापक त्यासाठी झटत आहेत. सुमारे १,१५० कोटी रुपये खर्चाच्या राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी अजून किमान दोन वर्षे लागतील, तर अन्य कामे पूर्ण होण्यास सात ते आठ वर्षे लागण्याची शक्यता आहे. सध्या पूर्वेकडील प्रवेशद्वार तसेच तळमजला बांधून पूर्ण झाला आहे.

मंदिराची रचना अशी

  • * लांबी (पूर्व-पश्चिम) ३८० फूट, रूंदी २५० फूट व उंची १६१ फूट
  • * १८ फूट उंचीचा ध्वजदंड
  • * तीन मजली मंदिर
  • * प्रत्येक मजल्याची उंची २० फूट, त्यात ३९२ खांब व ४४ द्वारे ’खांब व भिंतीवर देवदेवतांच्या मूर्ती

देशातील पोल्ट्री उद्योगाला चांगले दिवस ? जाणून घ्या कोणत्या देशांना किती निर्यात झाली

  • आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारतातून ६६४,७५३.४६ टन पोल्ट्री उत्पादनांची ५७ हून जास्त देशांना निर्यात झाली आहे. त्यांची एकूण किंमत सुमारे १,०८१.६२ कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी दिली.
  • केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाची नवी दिल्ली येथे २३ डिसेंबर रोजी धोरणात्मक बैठक झाली. या बैठकीत माहिती देताना अलका उपाध्याय म्हणाल्या, प्रथिने आणि पौष्टिक अन्नाची गरज म्हणून अंडी आणि ब्रॉयलरला मागणी वाढली आहे. अन्य शेतीमालाच्या उत्पादनात दरवर्षी सरासरी दोन टक्के दराने वाढ होत असताना अंडी आणि ब्रॉयलरच्या उत्पादनात वर्षाला आठ ते दहा टक्क्यांनी वाढ होत आहे. भारत अंडी आणि ब्रॉयलर मांसाचा प्रमुख निर्यातदार देश म्हणून पुढे आला आहे.
  • या आर्थिक वर्षात भारताने जागतिक बाजारपेठेत मुसंडी मारली आहे. देशातून जगातील ५७ हून जास्त देशांना ६६४,७५३.४६ टन पोल्ट्री उत्पादनाची निर्यात झाली आहे, त्यांचे एकूण मूल्य सुमारे १,०८१.६२ कोटी रुपये इतके आहे. बाजारपेठ संबंधित एका अभ्यासानुसार देशातील पोल्ट्री उद्योगात ३०.४६ अब्ज डॉलर्सची उलाढाल झाली आहे.

पोल्ट्री उद्योग बर्ड फ्ल्यू मुक्त

  • देशातील पोल्ट्री उद्योग उच्च पॅथोजेनिसिटी एव्हियन इन्फ्लुएंझापासून (बर्ड फ्ल्यू) मुक्त झाला आहे. तशी नोंदणी जागतिक प्राणी आरोग्य संघटनेकडे करण्यात आली आहे. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी जागतिक प्राणी संघटनेनेही त्याला मंजुरी दिली आहे, असेही केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने म्हटले आहे.

करोनाकाळात वाढला वापर

  • पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीला चालना देणे. व्यवसायात सुलभता आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. करोनाकाळात रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अन्न म्हणून अंडी आणि ब्रॉयलर मांसाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. बर्ड फ्ल्यूचा धोकाही कमी झाल्यामुळे पोल्ट्री उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असेही अलका उपाध्याय म्हणाल्या.

जगदंबेचा उल्लेख करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले “भारतीय नौदलाच्या वाढत्या ताकदीमुळे… “

  • विशाखापट्टनम वर्गातील (Visakhapatnam class destroyer) तिसरी युद्धनौका आयएनएस इम्फाळ ( INS Imphal) आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईतील नौदलाच्या तळावर झालेल्या शानदार कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत इम्फाळ युद्धनौकेवर पहिल्यांदाच नौदलाचा ध्वज सन्मानपूर्वक फडकवण्यात आला. विशाखापट्टनम वर्गात याआधी आयएनएस विशाखापट्टनम आणि मोरमुगाओ या दोन विनाशिका प्रकारातील युद्धनौका नौदलात दाखल झाल्या आहेत.
  • कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या भाषणात देव आणि दानव यांचा उल्लेख करत संरक्षण मंत्री म्हणाले की देवांकडे विविध शक्ती जरी असल्या तरी दानवांचा पराभव जवळ होत नव्हता, तेव्हा सर्व शक्ती एकत्र येत महाशक्ती जगदंबा उत्पन्न झाली आणि दानवांचा पराभव झाला. याचा उल्लेख करत राजनाथ सिंह म्हणाले की संरक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व विभागांनी पूर्ण ताकद लावत एकत्र येणे आवश्यक आहे. यामुळेच भारत महाशक्ती होण्यास मदत होणार आहे. INS Imphal हे त्याचेच एक प्रतिक आहे. संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या या युद्धनौकेच्या निर्मितीबद्दल संरक्षण मंत्र्यांनी तंत्रज्ञ, अभियंता आणि नौदलाचे अभिनंदन केले. Imphal मुळे इंडो-पॅसिफिक भागात भारतीय नौदलाची ताकद वाढण्यास आणखी मदत होणार आहे.
  • दरम्यान गेल्या काही दिवसांत भारताच्या दोन मालवाहू जहाजांवर समुद्रात हल्ल्याच्या घटना घडल्या. विशेषतः दोन दिवसांपूर्वी एका जहाजावर ड्रोनने हल्ला करण्यात आला. याचा उल्लेख करत राजनाथ सिंह म्हणाले ” गेल्या काही दिवसांत समुद्रात विविध घटनांमध्ये वाढ झाली आहे. आपल्या वाढलेल्या नौदलाच्या ताकदीमुळे काहींचा जळफळाट होत आहे. गेल्या काही दिवसांत भारताच्या मालवाहू जहाजांवर झालेले हल्ले हे गंभीरपणे घेण्यात आलेले आहेत. समुद्रात नौदलाची गस्त आणखी वाढवण्यात आली आहे. या घटनांमागे जे कोणी असतील ते समुद्राच्या तळाशी जरी असले तरी त्यांना आम्ही शोधून काढू असे आश्वासित करतो. देशाच्या जवळून होणारी जलवाहतूक आणि व्पापार हा मित्र देशांच्या मदतीने आम्ही आणखी सुरक्षित करु”.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२७ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.