२८ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२८ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |28 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२८ फेब्रुवारी चालू घडामोडी

मेग लॅनिंगने पाँटिंग-धोनीला मागे टाकत रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली कर्णधार

  • मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ आयसीसी टी-२० विश्वचषक २०२३ चा चॅम्पियन बनला. केपटाऊनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव केला. बेथ मुनीच्या (५३ चेंडूत नाबाद ७४ धावा) शानदार अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १५६/६ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात यजमान दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ६ गडी गमावून १३७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा ट्रॉफीवर कब्जा केला आहे. त्याचबरोबर मेग लॅनिंगने एक मोठा विक्रम केला आहे.
  • लॅनिंगने ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या रिकी पाँटिंगचा मोठा विक्रम मोडला आहे. लॅनिंग ही सर्वात मोठ्या आयसीसी स्पर्धा जिंकणारी कर्णधार बनली आहे. लॅनिंगने आतापर्यंत ५ स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने चार टी-२० विश्वचषक आणि एक वनडे विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर पाँटिंगने त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाला चार आयसीसी ट्रॉफी मिळवून दिल्या. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोन एकदिवसीय विश्वचषक आणि दोन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्याचबरोबर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत
  • ऑस्ट्रेलियाची विजेतेपदाची चौथी हॅटट्रिक – चॅम्पियन बनताच ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाने २०१८, २०२० आणि २०२३ मध्ये महिला टी-20 विश्वचषक जिंकला. लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या. सलग तीन ट्रॉफी जिंकणारी ती पहिली कर्णधार आहे. महिला टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची विजेतेपदाची ही दुसरी हॅटट्रिक आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी २०१०, २०१२ आणि २०१४ महिला टी-२० विश्वचषक जिंकले होते.

नवी स्टाईल, दमदार बॅटरी अन् मोठ्या ड्रायविंग रेंजसह देशात आल्या ‘या’ दोन इलेक्ट्रिक टू-व्हीलर

  • बेंगळुरू-मुख्यालय असलेल्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लॅटफॉर्म Yulu ने, Bajaj Auto च्या भागीदारीत, आज २७ फेब्रुवारी रोजी भारतात दोन नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर (e2Ws) Miracle GR आणि DeX GR in India लाँच केले. कंपनीचा दावा आहे की, ही नवीन इलेक्ट्रिक वाहने युलूचे एकूण आर्थिक मेट्रिक्स सुधारण्यासाठी उच्च कार्यक्षमतेची ऑफर देतात.
  • Yulu च्या AI-नेतृत्वाखालील तंत्रज्ञान स्टॅकद्वारे समर्थित आणि केवळ Bajaj Auto द्वारे उत्पादित, Miracle GR आणि DeX GR हे जगासाठी भारतात बनवलेले आहेत आणि चेतक तंत्रज्ञान (बजाज ऑटोची १०० टक्के मालकीची उपकंपनी) द्वारे आणले जात आहेत.
  • बजाज, ज्याची आधीच युलूमध्ये भागीदारी आहे, ते चेतक इलेक्ट्रिक स्कूटर देखील बाजारात विकत घेते. बजाज ऑटोने युलूच्या दुसऱ्या पिढीतील ई-स्कूटर्स आणि अंशतः उत्पादित घटकांना स्थानिकीकरण आणि अपग्रेड करण्यात मदत केली.
  • कंपनीच्या म्हणण्यानुसार, या नवीन थर्ड-जनरेशन ई-बाईक फुल प्रूफ, फॉल प्रूफ आहेत आणि OTA सपोर्ट देतील. युलू म्हणाले की, या नवीन ई-बाईक ट्रॅक करण्यायोग्य आहेत आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही वापरासाठी सुलभ चालना देतात. ऑक्‍टोबर २०२३ पर्यंत सुमारे १ लाख इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीचे कंपनीचे लक्ष्य आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

“देशाला इतिहासात अडकवू नका”, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

  • परकीय आक्रमकांनी बदललेली ऐतिहासिक स्थळांची मूळ नावे देण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ‘‘देशाच्या इतिहासातील गोष्टी वर्तमानावर आणि भावी पिढय़ांवर थोपवता येणार नाहीत. देश इतिहासात अडकून पडता कामा नये,’’ असे बजावत न्यायालयाने याचिकाकर्ते आणि भाजपनेते अश्विनी उपाध्याय यांची कानउघाडणी केली.
  • पुरातन स्थळांच्या नामांतरासाठी आयोग नेमण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्याची मागणी करणारी याचिका उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. वेद आणि पुराणांमध्ये उल्लेख असलेल्या अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना ‘परकीय आक्रमकांची’ नावे देण्यात आली असून त्यामुळे या स्थळांचे हिंदूंसाठी असलेले धार्मिक महत्त्व नष्ट झाले, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावताना याचिकाकर्त्यांच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली.
  • ‘‘भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली आणि परकीय सत्तांनी राज्यही केले. हे सत्य नाकारता येणार नाही,’’ असे सांगताना ‘‘तुम्हाला हा मुद्दा जिवंत ठेवून देशातील वातावरण तापवायचे आहे.
  • देशाचा भूतकाळ उकरून तो सध्याच्या पिढीसमोर मांडायचा आहे. मात्र, आम्हाला असे मुद्दे जिवंत करून देशाच्या सौहार्दाला धक्का बसवायचा नाही,’’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. अशा गोष्टींपेक्षाही महत्त्वाच्या अनेक समस्या आपल्यासमोर आहेत. त्यांचा विचार करून आपण मागे जाण्यापेक्षा पुढे जायला हवे, असेही न्यायालय म्हणाले.
  • सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा नूर पाहून उपाध्याय यांनी आपली याचिका मागे घेण्याची तयारीही दर्शवली. मात्र, खंडपीठाने त्यांना नकार देत ‘‘आम्हीच आता ही निकालात काढतो’’ असे सुनावले. ‘‘भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि न्यायपालिका हा धर्मनिरपेक्ष मंच आहे. आपल्या राज्यघटनेने ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द स्वीकारला असल्याने तिचे रक्षक म्हणून आम्ही कर्तव्याचे तंतोतंत पालन करू,’’ असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांला सुनावले. 

अग्निपथ योजना राष्ट्रहिताची; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाळा

  • अग्निपथ योजना राष्ट्रहिताची आहे आणि त्यामुळे संरक्षण दले अधिक सुसज्ज होतील असे निरीक्षण नोंदवत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारची ही योजना उचलून धरली आहे. न्या. सतीश चंद्र मिश्रा आणि न्या. सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने सोमवारी झालेल्या सुनावणीत या योजनेविरोधातील याचिका फेटाळल्या.
  • या योजनेमध्ये हस्तक्षेप करण्याचे काहीच कारण नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. पूर्वी प्रसिद्ध झालेल्या काही विशिष्ट जाहिरातीअंतर्गत संरक्षण दलांमध्ये भरती प्रक्रियेच्या विरोधातील याचिकाही न्यायालयाने फेटाळल्या. तसेच अशा उमेदवारांना सैन्यात नोकरी मागण्याचा अधिकार नाही असे कठोर निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
  • त्यापूर्वी, सरकारने दिलेल्या वयोमर्यादेमधील दोन वर्षांच्या सवलतीचा १० लाखांपेक्षा अधिक इच्छुक तरुणांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त महाधिवक्ता ऐश्वर्या भाटी आणि केंद्र सरकारचे वकील हरीष वैद्यनाथन यांनी दिली. अग्निपथ योजना हा संरक्षण भरतीमधील सर्वात मोठय़ा धोरणात्मक बदलांपैकी एक आहे आणि त्यामुळे संरक्षण दलांमध्ये भरतीच्या प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे असा दावा त्यांनी केला.
  • गेल्या वर्षी १४ जूनला केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार, वय वर्षे साडेसतरा ते एकवीस या दरम्यानच्या वयोगटातील तरुणांना भरतीसाठी अर्ज करता येतील. त्यांना चार वर्षांचा कालावधी मिळेल. या योजनेअंतर्गत भरती झालेल्यांपैकी २५ टक्के जणांना पुढे नियमित सेवेमध्ये दाखल करून घेतले जाईल. ही योजना जाहीर झाल्यानंतर त्याविरोधात अनेक राज्यांमध्ये निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने अर्ज करण्याची वयोमर्यादा वाढवून २३ वर्षे केली.

वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला मिळाले कोटी रुपये, जाणून घ्या कोणता पुरस्कार कोणाला मिळाला?

  • ऑस्ट्रेलिया संघाने महिला क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवत रविवारी सहाव्यांदा टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर सलग सात वेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिसलेला ऑस्ट्रेलियन संघ सहा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. अशा परिस्थितीत, जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला विजेतेपद जिंकल्यानंतर किती बक्षीस रक्कम मिळाली ते पाहूया? अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला विजेतेपदाचा मुकुट देण्यात आला आणि कोणत्या खेळाडूला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले?
  • आयसीसीने महिला टी-२० विश्वचषक २०२३ ची बक्षीस रक्कम आधीच जाहीर केली होती. या स्पर्धेत एकूण रु. २०.२८कोटी (US$24.5 दशलक्ष) पणाला लागले होते, जे संघांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे दिले जाणार होते. अशा परिस्थितीत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ८.२७ कोटी रुपये जमा झाले आहेत. तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला ४.१३ कोटी रुपये मिळाले.
  • उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या प्रत्येक संघाला १.७३ कोटी रुपये दिले गेले. ग्रुप टप्पा पार करू न शकलेले संघही रिकाम्या हाताने घरी परतले नाहीत. २४.८३ लाख रुपयांव्यतिरिक्त, सर्व संघांना गट सामने जिंकण्यासाठी प्रति सामना १४.४८ लाख रुपये मिळाले आहेत. त्यानुसार, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सुमारे २.२५ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेसह परतला आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार:

  • विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे.
  • पहिल्या दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळालं.
  • दरम्यान, यासंदर्भात बोलताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्याचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

एक कोटी लाभार्थीच्या ‘सेल्फी’ पंतप्रधानांना पाठविण्याचा उपक्रम:

  • ‘मला चष्मा मिळाला, चालण्याला आधार होईल असे वॉकर मिळाले. ‘वयोश्री’ योजनेमुळे मला खूप मदत झाली.
  • अशी योजना आखणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद’ असे सांगत सोमवारी वयोवृद्ध शीलाताई पत्की यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर त्या आजीबरोबर केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्याबरोबर ‘सेल्फी’ काढला आणि तो ‘नमो’ अ‍ॅपवर ‘ पाठवून’ दिला.
  • अशा एक कोटी स्वप्रतिमा अर्थात सेल्फी पाठविण्याच्या देशातील पहिल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारी औरंगाबाद येथे करण्यात आले.
  • ‘धन्यवाद मोदीजी’ या शब्दांसह लाभार्थीनी पाठविलेल्या पत्रानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कोटी स्वप्रतिमा (सेल्फी ) कार्यक्रम भाजपच्या वतीने सोमवारी स्मृती इराणी यांच्या हस्ते झाला.
  • जनधन बँक खाती, कोविडची मोफत लस घेणारे, उज्ज्वला गॅस, स्वच्छता गृह इथपासून ते प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळविणाऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचा आणि त्यांचे छायाचित्र व दहा सेकंदाचे चलचित्रण पक्ष कार्यालयाकडे पाठवा, असा कार्यक्रम आखण्यात आला आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२८ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

You may also like

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.