पाहिले महायुद्ध हे १९१४-१९१८ या दरम्यान झाले, त्याचप्रमाणे इंग्रजांनी भारतीय वृत्तपत्रांवरती निर्बंध लाडले होते. ६ एप्रिल १९१९ ला इंग्रजांनी भारतीयांवर रौलेट कायदा संमत केला. या कायद्याला विरोध म्हणून गांधीजींनी एक चळवळ चालविली. या बंदला पाठिंबा म्हणून उत्तर व पश्चिम भारतामध्ये शाळा, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. प्रामुख्याने पंजाबमध्ये ह्या उठावाला अधिक प्रतिसाद होता. या उठावाला इंग्रज सरकारचे प्रतिउत्तर म्हणजेच एप्रिल १९१९ मध्ये अमृतसरमध्ये घडलेली जलियानवाला बाग हत्याकांड. यामुळे भारतभर संतापाची लाट उसळली. या घटनेची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशनची नेमणूक करण्यात आली पण या कमीशनने डायरवर कोणतीच करवाई केलि नाही. या घटनेमुळे भारतीयांचा इंग्रजांच्या न्यायबुद्धिवर उरलासुरला विश्वास ही उडाला आणि असहकारचे आंदोलन पुढे आले.

असहकार चळवळ:

प्रत्यक्ष आंदोलनस सुरुवात – १ ऑगस्ट १९२०
१९२० च्या नागपुर अधिवेशनात राष्ट्रसभेने असहकारच्या ठरवास मान्यता दिली
या अधिवेशनाचे अध्यक्ष – चक्रवर्ती विजय राघवाचार्य
आंदोलनाची सर्व सूत्रे गांधिजीकडे सोपविण्यात आली


आंदोलनाचे स्वरुप:

शाळा, महाविद्यालये, विधिमंडळे, न्यायालये, कार्यालये, परदेशी माल यांवर बहिष्कार टाकून स्वदेशीचा पुरस्कार करण्यात आला
देशभर राष्ट्रीय शिक्षण देणार्या शिक्षणसंस्था स्थापन करण्यात आल्या

सी. आर. दास,
मोतीलाल नेहरु,
एम. आर. जयकर,
सैफुद्दीन किचलू,
विठ्ठलभाई पटेल,
वल्लभभाई पटेल,
राजगोपालाचारी
अशा प्रतियश वकिलांनी आपल्या व्यवसायाचा त्याग केला
महात्मा गांधींनीकैसर-इ-हिंद’ या पदवीचा तर
रविंद्रनाथ टगोरांनी ‘सर’ या पदवीचा तसेच
सुभाषचंद्र बोस यांनी ‘आईसीएस’
या पदवीचा त्याग केला
परदेशी मलाची होळी करण्यात आली
 पुरुषांप्रमाणे स्त्रियांचा आंदोलनात पुढाकार होता
१९२१ या एकाच वर्षात देशात ३९६ संप झाले
‘टिळक स्वराज्य फंडासाठी’ लोकांनी एक कोटीहून अधिक रक्कम जमा केली
‘स्वराज्य’ व ‘स्वदेशी’ यांचे पप्रतीक असलेला ‘चरखा’ घराघरात पोहचला

असहकार चळवळ : प्रमुख नेते(महाराष्ट्र)

शिवराम परांजपे 
हरिभाऊ फाटक
गंगाधर देशपांडे
चिंतामणराव वैद्य
काकासाहेब खाडीलकर
 वासुकाका जोशी

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.