राजश्री छत्रपती शाहू महाराज उर्फ चौथे शाहू हे कोल्हापूर संस्थानचे १८८४ ते १९२२ दरम्यान छत्रपती होते.

जन्म२६ जून १८७४
मृत्यु६ मे १९२२
वडिलांचे नाव आप्पासाहेब भोसले 
आईचे नाव राधाबाई
जन्मस्थान कागल 
जीवन कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्युनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंत यांना दत्तक घेतले आणि शाहू नाव ठेवले. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंत म्हणजेच २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.
उपाधी राजश्री  शाहू महाराजांना ‘राजश्री’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रीय समाजाने दिली.
कार्य शाहू महाराजांनी बहुजन शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ठ करण्याच्या दृष्टीने त्यांनी १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांना वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातीभेद बंद करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात अंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोशिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरुन झालेला वेदोक्त प्रकरण शाहू महरजांच्याच काळात झाला. ‘शाहू छत्रपती स्पिनिंग एंड वीव्हिंग मिल’ शाहपुरी व्यापरपेठ, शतकर्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड एग्रीकल्चरल इंस्टीट्यूट’ इ. संस्था कोल्हापूरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्यांना कर्जे उपलब्ध करुण देणे अशा उपक्रमातून त्यांनी कृषी विकासाकडे लक्ष पुरवले. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.