mpsc today logo
mpsc today logo

 सामाजिक कारणे:

केवळ स्वत:ची संस्कृती श्रेष्ठ मानताना इंग्रजांनी संस्कृतीला रानटी संस्कृती व भारतीय लोकांना रानटी असे संबोधले त्याचप्रमाणे सतिबंदी कायदा, बालविवाहप्रतिबंधक कायदा, विधवा-पुनर्विवाह कायदा यासारखे काही अन्यायकारक कायदे ब्रिटिशांनी भारतात राबविले.
परंपरागत भारतीय समाजाला हे आपल्या संस्कृतीवर संकट वाटले.

* धार्मिक कारणे:

१८१३ च्या कायद्याने इंगलंडमधील कोणत्याही व्यक्तीला धर्मप्रसारासाठी भारतात जाण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले.
पर्यायाने इंग्रजी आक्रमणाने प्रथम सत्ता गेली, नंतर व्यापार-उदीम बुडाला आणि आता  धर्मावर संकट आल्याची भावना वाढीस आली.
१८०६ मध्ये लष्कराच्या मद्रास छावनीतील शिपयांना गंध लावण्यास व दाढ़ी वाढवण्यास बंदी घालण्यात आली.
१८४२ साली ब्रम्हदेशच्या युद्धात हिंदू शिपयांना सक्तीने पाठविण्यास आले. परदेशगमन, समुद्र पर्यटन या गोष्टी त्याज्य मानणाऱ्या हिंदी शिपयांत यामुळे असंतोष वाढू लागला.

* आर्थिक कारणे:

१. हस्तव्यवसायाची अधोगती: भारतातील कच्चा मालावार अधोरित इंग्लंडमधील यंत्रावरील तयार माल भारतात उपलब्ध झाल्याने येथील पारंपारिक हस्तव्यवसायचा क्षय होत गेला आणि करागीर पुरते बुडाले.
२. शेतकरी-जमीनदार या वर्गात रयतवारी, महालवारी, कायमधारा आदि सदोष महसुलपद्धतीमुळे असंतोष पसरला.



* लष्करी कारणे:

हिंदी शिपयांना ब्रिटिश सैन्याच्या तुलनेत मिळणारी अन्यायी वागणूक, हिंदी शिपयांवरील लष्करातील शिस्तीसंबंधीचे जाचक नियम इत्यादी कारणांमुळे सैनिकांत असंतोष होता.

* राजकीय कारणे:

१. वेलेस्लीच्या तैनाती फ़ौजेचे दुष्परिणाम: तैनाती फ़ौजेच्या पद्धतीमुळे इंग्रज फ़ौजेचा सर्व ख़र्च ती ज्याच्या पदरी असेल त्या राजाने करायचा व त्या फ़ौजेवर हुकूमत गाजवायची ती मात्र इंग्रजांनी या वेलेस्लीच्या मुत्सद्दी डावपेचामुळे तैनाती फ़ौजेच्या प्रभावाखालील राज्ये दुबळी बनली व त्यांच्यात असंतोष निर्माण झाला.
२. डलहौसीचे आक्रामक विस्तारवादी धोरण: प्रशासकीय सोयीसाठी भारतातील सर्व भूप्रदेश एकछत्री अमंलाखाली आणण्याच्या हेतूने लॉर्ड डलहौसीच्या १८४८ ते १८५६ या काळात भारतातील अनेक संस्थाने ‘दत्तक वारसा नामंजूर’ तत्त्वानुसार तसेच प्रशासनात गौरकारभार कारणावरून खालसा केली. याशिवाय राजेराजवाड्यांच्या पदव्या आणि तनखे बंद करून टाकले.


* तात्कालीन कारण:

सौनिकांनी बंदुकीची काडतूसे वापरताना त्यांची आवरणे दातांनी तोडावी लागत, या काडतुसांना गाईची व डुकरांची चरबी लावलेली असते अशी बातमी लष्करात पसरताच हिंदू-मुस्लिम सैनिकांच्या धर्मभावना दुखावल्या आणि ते बंड करून उठले. अशाप्रकारे वर्षानुवर्षे दाटलेल्या असंतोषाच्या उद्रेक १८५७ च्या उठावाने झाला.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.