१२ जुलै चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१२ जुलै चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |12 July 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१२ जुलै चालू घडामोडी

पार्थ साळुंखेची ऐतिहासिक कामगिरी, युवा जागतिक तिरंदाजीच्या पुरुष रिकर्व्ह विभागात सुवर्णपदक

  • महाराष्ट्राच्या पार्थ साळुंखेने ऐतिहासिक कामगिरी करताना युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील पुरुष रिकर्व्ह विभागात सुवर्णपदकाची कमाई केली. युवा जागतिक स्पर्धेतील रीकव्र्ह गटात सोनेरी यश संपादन करणारा पार्थ भारताचा पहिला पुरुष तिरंदाज ठरला आहे. तसेच भारताने युवा जागतिक तिरंदाजीत आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना एकूण ११ पदके पटकावली.
  • साताऱ्याच्या पार्थने २१ वर्षांखालील पुरुषांच्या रीकव्र्ह विभागातील अंतिम लढतीत सातव्या मानांकित कोरियाच्या सॉन्ग इन्जुनचा ७-३ असा पराभव केला. १९ वर्षीय पार्थ सुरुवातीला पिछाडीवर होता. पहिला सेट २६-२६ असा बरोबरीत राहिल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सॉन्गने २५-२८ अशी बाजी मारताना एकूण लढतीत आघाडी मिळवली. मात्र, पार्थने दडपणाखाली संयम बाळगताना पुढील तीन सेट अनुक्रमे २८-२६, २९-२६, २८-२६ असे जिंकत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
  • त्याचप्रमाणे २१ वर्षांखालील महिलांच्या रिकर्व्ह विभागात भारताच्या भजन कौरने कांस्यपदक मिळवले. तिने चायनीज तैपेइच्या सु हसीन-यु हिला ७-१ (२८-२५, २७-२७, २९-२५, ३०-२६) असे सहज पराभूत केले.भारताने या स्पर्धेत सहा सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण ११ पदके पटकावली. युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील ही भारताची सर्वाधिक पदके ठरली. मात्र, भारताला पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कोरियाने अग्रस्थान मिळवले.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा कटऑफ तिसऱ्या फेरीत घटणार का? तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज

  • अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज (१२ जुलै) सकाळी दहा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना १४ जुलैपर्यंत महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घेता येणार आहे.
  • पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अकरावी प्रवेशाठी ३२४ महाविद्यालयांत एकूण एक लाख १४ हजार ५५० जागा उपलब्ध आहेत. त्यात ९० हजार १०९ जागा केंद्रीभूत प्रवेशांसाठी, तर राखीव (कोटा) प्रवेशांसाठी २४ हजार ४११ जागांचा समावेश आहे. आत्तापर्यंत झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये कोटा आणि केंद्रिभूत प्रवेश मिळून ३७ हजार ८५१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तर प्रवेशासाठी ७६ हजार ६९९ जागा उपलब्ध आहेत.
  • शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पात्रता गुण नव्वदीपार असल्याने तिसऱ्या फेरीत तरी पात्रता गुणांमध्ये घट होणार का, याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. तिसऱ्या फेरीतील नियमित प्रवेशांबरोबरच द्विलक्ष्यी आणि कोटाअंतर्गत प्रवेश १४ जुलैपर्यंत होणार आहेत.

प्रार्थनास्थळ कायदा : केंद्राला बाजू मांडण्यासाठी ३१ ऑक्टोबपर्यंत मुदत

  • सर्वोच्च न्यायालयाने ‘प्रार्थनास्थळ कायदा, १९९१’ च्या काही तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर उत्तर दाखल करण्यासाठी केंद्राला ३१ ऑक्टोबपर्यंत वेळ दिला आहे. संबंधित कायद्यात असे नमूद केले आहे की १५ ऑगस्ट १९४७ रोजी अस्तित्वात असलेल्या प्रार्थनास्थळांचे धार्मिक स्वरूप त्या दिवशी अस्तित्वात होते, तसेच कायम राहील. या धार्मिक स्थळांचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी किंवा त्याचे स्वरूप बदलण्यासाठी खटला दाखल करण्यास या कायद्यानुसार मनाई आहे.
  • सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने मंगळवारी केंद्रातर्फे महान्याय अभिकर्ता तुषार मेहता यांच्या निवेदनाची दखल घेतली. मेहतांनी निवेदन केले होते, की सरकारने त्यावर विचार केला असून, ते सविस्तर उत्तर दाखल करणार आहेत. हे निवेदन विचारार्थ घेऊन खंडपीठाने याचिकांवर उत्तर दाखल करण्यासाठी केंद्राला ३१ ऑक्टोबपर्यंत मुदत दिली.त्यावर आक्षेप घेत भाजप नेते व याचिकाकर्ते सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयास सांगितले, की केंद्र सरकार या प्रकरणी वारंवार स्थगिती घेत आहे. कृपया या प्रकरणी अंतिम सुनावणीसाठी ही याचिका सूचिबद्ध करावी.
  • खंडपीठाने स्पष्ट केले, की भारत सरकारने स्थगितीची मागणी केली आहे. त्यांना उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र दाखल करू द्या. ते आम्हाला पहावे लागेल. खंडपीठाने हेही यावेळी स्पष्ट केले, की या कायद्याच्या अंमलबजावणी रोखण्यात आलेली नाही.न्यायालयाने वकील वृंदा ग्रोवर यांना आपल्या याचिकेची प्रत महान्याय अभिकर्त्यांच्या सहाय्यक वकिलांना सुपूर्द करण्यास सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने ‘प्रार्थनास्थळ कायदा, १९९१’ मधील काही तरतुदींच्या वैधतेस आव्हान देणाऱ्या जनहित याचिकांवर आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यासाठी फेब्रुवारी अखेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. वकील अश्विनी उपाध्याय आणि राज्यसभेचे माजी सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांच्या यासंदर्भातील जनहित याचिकांवर ही सुनावणी होत आहे.

चित्रपटगृहातील खाद्यपदार्थ होणार स्वस्त, जीएसटी परिषदेचा मोठा निर्णय

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) परिषदेच्या ५० व्या बैठकीत चित्रपटगृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच काही जीवरक्षक औषधांच्या आयातीवरील करात सूट देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
  • ‘लाइव्ह मिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटगृहामध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरील कर १८ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रेक्षकांच्या खिशावरील भार कमी होणार आहे.
  • नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना पश्चिम बंगालचे अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितलं की, जीएसटी परिषदेने कर्करोगावरील औषध डिनुटक्सिमॅब (Dinutuximab) आणि इतर दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या ‘फूड फॉर स्पेशल मेडिकल पर्पज’ (FSMP) च्या आयातीवर जीएसटीमध्ये सूट देण्यास मान्यता दिली आहे. तसेच ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो (जुगाराचा प्रकार) आणि घोड्यांच्या शर्यतींवर २८ टक्के कर लावण्यासही परिषदेनं सहमती दर्शवली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

यशस्वीला पदार्पणाची संधी? भारत-विंडीज पहिला कसोटी सामना आजपासून

  • भारतीय कसोटी संघात बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून आज, बुधवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मुंबईकर यशस्वी जैस्वालला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यासह भारताच्या सर्वच फलंदाजांच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल.
  • भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीतील पराभवानंतर प्रथमच मैदानावर उतरणार आहे. दुसरीकडे, विंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक पात्रता स्पर्धेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पहिल्यांदा कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कामगिरी उंचावून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात करण्यासाठी उत्सुक असतील. डॉमिनिका येथील विन्डसर पार्कवर सहा वर्षांनंतर कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.
  • गेल्या महिन्यात इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. या अपयशानंतर निवड समितीने अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर डावखुरा फलंदाज यशस्वीला संधी मिळू शकेल. देशांतर्गत क्रिकेट आणि ‘आयपीएल’मधील चमकदार कामगिरीच्या बळावर यशस्वीने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. आता विंडीजविरुद्ध दोनही कसोटी सामन्यांत दर्जेदार कामगिरी करताना भारतीय संघातील स्थान भक्कम करण्याचा यशस्वीचा प्रयत्न असेल.
  • यशस्वी हा मूळ सलामीवीर असल्याने त्याला कर्णधार रोहित शर्मासह सलामीला पाठवून शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर खेळवणे अधिक योग्य ठरेल असाही मतप्रवाह आहे. परंतु गिलने सलामीला खेळताना गेल्या काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचा फलंदाजीचा क्रम बदलण्याचा धोका भारतीय संघ व्यवस्थापन पत्करण्याची शक्यता कमी आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१२ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.