१२ मे चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१२ मे चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |12 May 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१२ मे चालू घडामोडी

माहीची ग्रेट-भेट! धोनीने ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंट्री ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ टीमला CSKची जर्सी दिली गिफ्ट

  • भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंटरी ‘द एलिफंट व्हिस्पर्स’चे दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस, बोमन आणि बेली यांची ग्रेट-भेट घेतली. धोनीने ‘द एलिफंट व्हिस्पर्स’च्या संघाला स्वतःची ७ नंबर असणारी चेन्नई सुपर किंग्जची जर्सी गिफ्ट दिली, ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
  • ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने ९५व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा ऑस्कर जिंकला आहे. अलीकडेच चेन्नई सुपर किंग्जच्या एका खास कार्यक्रमादरम्यान वास्तविक जीवनातील हत्तीची काळजी घेणारे बोमन आणि बेली यांनी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली. महेंद्रसिंग धोनीचे फॅन पडल्याचे किस्से वेळोवेळी पाहायला मिळतात. त्याचे प्रियजन त्याला देव मानतात.
  • टीम चेन्नई सुपर किंग्सने आपल्या इंस्टाग्रामवर काही छायाचित्रांसह एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये धोनी आणि सीएसकेचे व्यवस्थापन चेपॉक स्टेडियमवर ‘द एलिफंट व्हिस्पर्स’च्या टीमचे स्वागत करताना दिसत आहेत. प्रथम धोनीने त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि नंतर त्यांना त्याच्या नावाची छापलेली जर्सी भेट दिली. यादरम्यान धोनीची मुलगी झिवाही टीम ‘द एलिफंट व्हिस्पर्स’चे सदस्य कार्तिकी गोन्साल्विस, बोमन आणि बेली यांना भेटली आणि फोटो काढले.
  • मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ससाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हत्तींचे केअरटेकर, बोमन आणि बेली देखील उपस्थित होते. यावेळी त्यांचा गौरव करण्यात आला. एम.एस. धोनीने त्याची जर्सी भेट देऊन त्याचा गौरव केला. यासोबतच त्याला चेन्नई सुपर किंग्जकडून मोमेंटोही देण्यात आला. हत्तींची काळजी घेण्यासाठी त्याला चेन्नई सुपर किंग्जकडून धनादेश देण्यात आला होता. टीमने इव्हेंटमधील फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “आमची मनं जिंकणाऱ्या टीमला टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करा! बोमन, बेली आणि फिल्ममेकर कार्तिकी गोन्साल्विस यांचे अभिवादन करून खूप छान वाटले आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले हे आमचे भाग्य आहे.”

मिनिटभर गाडी चालवा, पक्के वाहन परवाने घ्या!

  • राज्यात वाहन चालवण्याच्या पक्क्या परवान्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाचणीत सर्व निकष पाळले जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या चाचणीत अनुत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. वाहन परवाना चाचणी सरासरी एका मिनिटात उरकली जात असून, किमान निकषांचे पालन न करता परवाना दिला जात आहे. दरम्यान, योग्य पद्धतीने चाचणी न घेता परवाना दिला जात असल्याने अपघातांमध्ये वाढ होत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
  • राज्यात ५० प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) आहेत. परिवहन विभागानेच दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१७ ते २०२२ या कालावधीत राज्यात वाहन परवाना चाचणीत अनुत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण २.४ टक्के आहे. १४ आरटीओंमध्ये वाहन परवाना चाचणीत अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. फक्त सहा आरटीओंमध्ये अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५ टक्क्यांहून अधिक आहे. वाहन परवाना चाचणीसाठी मोटार वाहन कायद्यानुसार २४ निकष आहेत. हे सर्व निकष आरटीओकडून पाळले जात नाहीत. पक्क्या परवान्यासाठी ही चाचणी अगदी चुटकीसरशी घेतली जात आहे. वाहन परवाना चाचणीचा सरासरी वेळ दुचाकीसाठी १६ ते २० सेकंद, मोटार व रिक्षासाठी १ मिनिट आणि जड वाहनांसाठी ३ मिनिटे आहे.
  • वाहन चालवण्यासाठी सुरुवातीला सहा महिन्यांसाठी शिकाऊ परवाना दिला जातो. नंतर पक्क्या परवान्यासाठी प्रत्यक्ष वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाते. पुण्यात मोटारीचा वाहन परवाना प्रथमच घेत असल्यास वाहन चालन व प्रशिक्षण संस्थेतील (आयडीटीआर) ट्रॅकवर ही चाचणी होते. तसेच आळंदी रस्त्यावरील फुलेनगर येथे दुचाकी, तीन चाकी आणि इतर जड वाहनांच्या परवान्यासाठी चाचणी घेतली जाते. मोटारीच्या परवान्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा परवाना मिळवण्यासाठी आळंदीतील ट्रॅकवर पुन्हा चाचणी द्यावी लागते.

एलॉन मस्क देणार ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा; नवीन सीईओ म्हणून महिलेची नियुक्ती, सहा आठवड्यात स्वीकारणार पदभार

  • एलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडण्याची घोषणा केली असून त्यांनी या पदासाठी एका महिलेची निवड केली आहे. मस्क यांनी अद्याप नव्या सीईओचं नाव घोषित केलं नसलं तरी नवीन सीईओ येत्या सहा आठवड्यांत पदभार स्वीकारतील, अशी माहिती मस्क यांनी ट्वीटद्वारे दिली.
  • ते म्हणाले, ट्विटरसाठी नव्या सीईओंची निवड केल्याचं जाहीर करताना मला आनंद होत आहे. ट्वीटरचे नवीन सीईओ येत्या सहा आठवड्यांत पदभार स्वीकारतील. राजीनामा दिल्यानंतर मी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी तसेच सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमचं काम पाहीन”
  • एलॉन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये ट्विटर विकत घेतलं, तेव्हापासून ते त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ट्विटरला कायमस्वरूपी सीईओ नाही. नवे सीईओ आल्यानंतर माझी भूमिका बदलेल. मला कोणत्याही कंपनीचे सीईओ व्हायचं नाही, असं त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं.
  • दरम्यान, मस्क यांनी यासंदर्भात १९ डिसेंबर रोजी ट्विटरवर पोल सुरू केला होता. “मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हायला हवं का? या पोलचा येणारा निकाल मला मान्य असेल, मी तो पाळेन”, असं एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. त्यावेळी तब्बल ५७.५ टक्के युजर्सनं पदावरून पायउतार होण्याच्या बाजूने मत दिलं होतं.

नऊ मुद्द्यांच्या आधारे जाणून घ्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल!

  • महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला असून हा निकाल एकूण ९ मुद्द्यांच्या आधारे न्यायालयाने नमूद केला आहे. यात प्रतोदची नियुक्ती, राज्यपालांचे निर्णय, बहुमत चाचणीचे आदेश यासंदर्भात शिंदे गटाला धक्का बसला आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिल्यामुळे पुन्हा त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवता येणार नाही, असंही न्यायालयाने यावेळी नमूद केलं.
  • काय आहे न्यायालयाचा ९ कलमी निकाल?
  • १. नबम रेबिया प्रकरणातील तरतुदी इथे लागू होतात की नाही याचा निर्णय सात सदस्यीय मोठ्या खंडपीठासमोर होईल.
  • २. आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयात हे न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर आमदार अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा.
  • ३. अपात्रतेसंदर्भातली नोटीस बजावलेली असतानाही कोणताही आमदार सभागृहाच्या कामकाजाच सहभागी होऊ शकतो. त्यामुळे सभागृहात झालेल्या कामकाजाची वैधता आमदारांच्या अपात्रतेबाबत होणाऱ्या निर्णयावर अवलंबून असू शकत नाही.
  • ४. विधिमंडळ पक्ष नसून राजकीय पक्षच प्रतोदाची नियुक्ती करत असतो. विशिष्ट पद्धतीने मतदान करणं किंवा अनुपस्थित राहाणं याचे आदेश राजकीय पक्ष देत असतो, विधिमंडळ पक्ष नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाकडून नियुक्त केलेल्या प्रतोदांना मान्यता देणं बेकायदेशीर होतं.
  • ५. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाला त्यांच्यासमोर आलेल्या प्रकरणांवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
  • ६. यासंदर्भात निर्णय घेताना निवडणूक आयोगाने त्यासाठी सर्वाधिक लागू होणाऱ्या पद्धतीनुसार निर्णय घ्यायला हवा.
  • ७. पक्षफुटीनंतर आमदारांना अपात्रतेसं संरक्षण मिळण्याची सूट या प्रकरणात राहात नाही. विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवून त्यावर आधारीत अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यावा. दहाव्या परिशिष्टातील दुसऱ्या परिच्छेदाचा संदर्भ घ्यावा, जिथे दोन किंवा अधिक गट संबंधित राजकीय पक्ष असल्याचा दावा करत असतील.
  • “अब हमारी भूमिका खतम”, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी दिली सूचक प्रतिक्रिया!
  • ८. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश उद्धव ठाकरेंना देणं बेकायदेशीर होतं. त्यांच्यासमोर सबळ पुरावे नव्हते. पण उद्धव ठाकरेंना आता पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही कारण उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता त्यांचा राजीनामा सादर केला होता.
  • ९. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळेच भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याचा राज्यपालांना निर्णय योग्य ठरतो.

व्हॉट्सॲपवर तुम्हालाही येताहेत का आंतरराष्ट्रीय क्रमाकांवरून मिसकॉल? कंपनीनं दिलं स्पष्टीकरण

  • जगभरातील कोट्यवधी युजर्सना एका क्लिकवरून संपर्कात ठेवणाऱ्या व्हॉट्सॲपवरून सध्या भलताच स्कॅम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲपवर आंतरराष्ट्रीय क्रमांकावर व्हॉइस मिस कॉल येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक व्हॉट्सॲप युजर्सने याबाबती तक्रारी केल्या आहेत. संपूर्ण देशात ही समस्या वाढली असून याप्रकरणी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. यावरून आता व्हॉट्सॲपच्या प्रवक्त्याने याप्रकरणी खुलासा केला आहे.
  • व्हॉट्सॲपच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, “आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सेफ्टी टूल देत आहोत. व्हॉट्सॲपवर ब्लॉक-रिपोर्टचाही पर्याय उपलब्ध आहे. या ॲपवरून होणाऱ्या अनैतिक कामांवर प्रतिबंध घालण्याचा आमचा कायम प्रयत्न असेल.परंतु, आता नवा स्कॅम आला आहे. यामध्ये एका क्रमाकांवर मिस कॉल दिला जातो. त्या नंबरवर लोकांना परत कॉल केला की त्यांच्यासोबत स्कॅम केला जातो. परंतु, या स्कॅमवर व्हॉट्सॲपने ५० टक्क्यांपर्यंत प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न केला आहे.”
  •  
  • काही दिवसांपूर्वी याप्रकरणी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही मोठं विधान केलं होतं. फोनमध्य इनबिल्ड असलेल्या अॅप्सना काय काय अॅक्सेस करण्याची परवानगी मिळाली पाहिजे. युजर्सच्या डेटाच्या सुरक्षेची जबाबादारी संबंधित कंपन्यांनी घ्यायला हवी.

आम्हाला नाही तर तुम्हालाही नाही!  विश्वचषक २०२३ खेळण्यासाठी पाकिस्तानचा भारतात येण्यास नकार

  • आयसीसी एकदिवसीय विश्वचषक या वर्षाच्या अखेरीस भारतात होणार आहे. या मेगा इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान क्रिकेटचा संघ यात सहभागी होणार आहे की नाही याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. आम्ही या स्पर्धेत सहभागी होणार असे मान्यता अद्याप दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याशिवाय विश्वचषक होणार का? असे प्रश्न क्रिकेट वर्तुळात निर्माण होत आहेत.
  • इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या हंगामाच्या समाप्तीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या मेगा इव्हेंटचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करू शकते. आयसीसी बोर्ड सदस्याने पीटीआयला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताचे पाकिस्तानात जाणे आणि पाकिस्तानचे भारतात येणे या दोन्ही देशांच्या बोर्डावर अवलंबून नाही. भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही पीसीबी सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतरच निर्णय घेऊ शकते.
  • आशिया चषकाच्या आयोजनावरून बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये हे दंद्वयुद्ध पाहायला मिळत आहे. पीसीबीचे हायब्रीड मॉडेल उर्वरित देशांनी नाकारल्यानंतर आता आशियाई क्रिकेट परिषद (ACC) सप्टेंबर महिन्यात श्रीलंकेत आयोजित करण्याची तयारी करत आहे. अशा स्थितीत पाकिस्तानही आशिया चषकातून बाहेर पडू शकतो. आशिया चषकाबाबत पाकिस्तानने केलेल्या हायब्रीड प्लॅनप्रमाणे भारताने आपले सामने यूएईमध्ये खेळवले असते आणि उर्वरित संघ केवळ पाकिस्तानमध्येच खेळले असते. यालाही बीसीसीआयने मान्यता दिलेली नाही.
  • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे काही अधिकारी जिओ टीव्हीवर बोलताना म्हणाले, “जर भारत आशिया चषकासाठी पाकिस्तानात खेळायला येऊ शकत नाही तर आम्हीही विश्वचषक २०२३मध्ये सहभागी होणार नाही. आमच्याशिवाय विश्वचषक खेळा.” वास्तविक, पाकिस्तान आशिया चषक २०२३चे आयोजन करत आहे, परंतु बीसीसीआय सचिव जय शाह यांनी खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानला जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. पीसीबी आणि बीसीसीआयमध्ये या मुद्द्यावरून दररोज वाद होत आहेत. अशा परिस्थितीत भारत पाकिस्तानात जाणार का? आणि पाकिस्तानचा संघ भारतात येणार का? या प्रश्नांची उत्तरे दोन्ही देशांच्या सरकारवर अवलंबून आहेत.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१२ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.