राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे
१ | २८ डिसेंबर १८८५ | मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन. वोमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष. |
२ | २८ डिसेंबर १८८६ | दुसरे अधिवेशन कलकत्ता येथे भरले. दादाभाई नौरोजी अध्यक्ष. |
३ | २८ डिसेंबर १९८७ | तिसरे अधिवेशन मद्रास येथे भरले. |
४ | २८ डिसेंबर १८८८ | अलाहाबादच्या ब्रिटिश शासनाचा विरोध. |
५ | १८९६ ते १८९९ | दुष्काळात व प्लेगची साथ केसरीतील लेखावरून टिळकांना अटक व दीड वर्षाची शिक्षा. |
६ | १९ जुलै १९०५ | बंगालच्या फाळणी व भारतात वंगभंग आंदोलनास सुरुवात. टिळकांची स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतु:सूत्री घोषणा. |
७ | २८ डिसेंबर १९०५ | वाराणसी येथील अधिवेशनात वसाहतीच्या स्वराज्याची घोषणा. |
८ | २८ डिसेंबर १९०६ | कलकत्ता अधिवेशनात चतु:सूत्री चा ठराव पास. |
९ | २८ डिसेंबर १९०७ | सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट व टिळकांना मंडाले येथे सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा. |
१० | १९ जानेवारी १९१५ | गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात. |
११ | एप्रिल १९१६ | टिळकांनी पुण्यातून होमरूल लीग चळवळ सुरु केली. |
१२ | सप्टेंबर १९१६ | डॉ. अनिबेझंट यांची मद्रास येथे हिमरूल चळवळ सुरु केली. |
१३ | सन १९१७ | गांधीजींचा चंपारण्य येथे निळीचा सत्याग्रह केला. |
१४ | २८ डिसेंबर १९१७ | लखनौ शिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश व काँग्रेस मुस्लिम लीग यांच्यात करार. |
१५ | सन १९१८ | गुजरातमधील खेडा येथे गांधीजींनी साराबंधी चळवळ केली. |
१६ | ६ एप्रिल १९१९ | रौलकट कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसचा भारतभर बंद. |
१७ | १३ एप्रिल १९१९ | जालियनवाला बाग हत्याकांड. |
१८ | २४ ऑक्टोम्बर १९१९ | खिलाफत चळवळीला सुरुवात. |
१९ | १ ऑगस्ट १९२० | रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. |
२० | २८ डिसेंबर १९२० | नागपूर अधिवेशनात असहकार आंदोलनाचा ठराव पास. |
२१ | १८ फेब्रुवारी १९२२ | उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथील घटनेवरून असहकार आंदोलन मागे घेण्यात आले. |
२२ | सन १९२३ | चित्तरंजन दास यांनी अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. |
२३ | २८ डिसेंबर १९२७ | राष्ट्रीय काँग्रेसच्या मद्रास अधिवेशनात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. |
२४ | ३ फेब्रुवारी १९२८ | मुंबईत सायमन कमिशनला विरोध व लाहोर येथे सँडर्स लाठी हल्य्यात लाला लजपत राय जबर जखमी होऊन त्यांचे निधन झाले. |
२५ | फेब्रुवारी १९२८ | घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता नेहरू समितीची स्थापना. |
२६ | १९ मे १९२८ | मुंबईत नेहरू रिपोर्टची घोषणा. |
२७ | २८ डिसेंबर १९२८ | कलकत्ता अधिवेशनात नेहरू रिपोर्टला मान्यता व वसाहतीच्या स्वराज्याची मागणी. |
२८ | २८ डिसेंबर १९२९ | लाहोर अधिवेशनात पंडित नेहरू यांनी संपूर्ण स्वात्रंत्र्याची मागणी केली. सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. |
२९ | १२ मार्च १९३० | गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याकरिता ७८ अनुयायांसह प्रवासाला सुरुवात केली. |
३० | ६ एप्रिल १९३० | गांधीजी दांडी मिठाचा कायदा मोडला. गुजरातमधील धारासना महाराष्ट्रातील वडाळा ( मुंबई ) , शिरोडा व मालवण ( सिंधुदुर्ग ) व कर्नाटकमधील शनीकट्टा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह. |
३१ | ६ मे १९३० | महात्मा गांधीजींना शासनाने अटक केली. |
३२ | ६ मे १९३० | सोलापूरला गिरणी कामगारांचा संप व लष्करी कायदा लागू. सविनय कायदेभंग आंदोलन काळात वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान ( सरहद्द गांधी ) यांचा लढा. |
३३ | ५ मार्च १९३१ | गांधीजी व आयर्विन करार व गांधीजींनी कायदेभंग चळवळ मागे घेतली. |
३४ | मार्च १९३१ | कराची अधिवेशनात मूलभूत हक्क व आर्थिक कार्यक्रमाचा ठराव मंजूर. |
३५ | सन १९३४ | जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. |
३६ | २८ डिसेंबर १९३६ | राष्ट्रीय काँग्रेसचे फैजपूर हे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. |
३७ | सन १९३७ | सन १९३५ च्या कायद्यानुसार झालेल्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत देशातील अकरा प्रांतापैकी आठ प्रांतामध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन. |
३८ | २८ डिसेंबर १९४० | राष्ट्रीय कोंगीसच्या रामगढ अधिवेशनात वैयक्तित सत्याग्रहाचा ठराव पास व वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड. |
३९ | मार्च १९४२ | क्रिप्स मिशन भारतात आले. |
४० | ८ ऑगस्ट १९४२ | मुंबई येथे गवलीया टॅंक मैदानावर चाले जाव आंदोलनास सुरुवात. |
४१ | १८ फेब्रुवारी १९४६ | मुंबईतील युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. |
४२ | २४ मार्च १९४६ | त्रिमंत्री कमिशन भारतात आले. |
४३ | २ सप्टेंबर १९४६ | पंडित नेहरू यांच्या नेतृतवाखाली हंगामी सरकारची स्थापना. |
४४ | २४ मार्च १९४७ | माउंटबॅटन भारतात आले. |
४५ | ३ जून १९४७ | फाळणीची योजना प्रसिद्ध करण्यात आली. |
४६ | १८ जुलै १९४७ | ब्रिटिश पर्लमेंटने भारतीय स्वातंत्र्याच्या कायदा पास केला. |
४७ | १४ ऑगस्त १९४७ | पाकिस्तानला स्वातंत्र देण्यात आले. |
४८ | १५ ऑगस्ट १९४७ | रात्री ठीक बाराच्या ठोक्याला दिल्लीच्या लाल किल्लयावर भारताला स्वात्रंत प्रदान |